नवी दिल्ली: गेल्या शनिवारी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत Reliance Jio च्या दूरसंचार सेवेवर परिणाम झाला. नेटवर्क डाऊन झाल्यामुळे यामुळे जिओचे युजर्स चांगलेच नाराज झाले. अनेक युजर्सनी कॉल कनेक्ट न होण्याची आणि डेटामध्ये प्रवेश नसल्याची तक्रार केली. या समस्येनंतर लोकांनी ट्विटरवर याबाबत तक्रारही केली. सुमारे ८ तास सेवा विस्कळीत झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला. अशा परिस्थितीत, लोकांच्या तक्रारी लक्षात घेऊन, कंपनीने जाहीर केले आहे की, नेटवर्क डाउनमुळे अडचणींचा सामना करणाऱ्या युजर्सना कंपनी नुकसान भरपाई देईल. रिलायन्स जिओने म्हटले आहे की, कंपनी युजर्सना दोन दिवस मोफत सेवा देऊन तोटा भरून काढेल. ही सेवा फक्त मुंबईतच खंडित झाली होती, त्यामुळे या सेवेचा लाभ कोण घेणार आणि त्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न अनेकांना पडला असेल? चला जाणून घेऊया सर्व सविस्तर. वाचा: फक्त या ६ टिप्स फॉलो करा, तुम्ही कधीच ऑनलाइन फ्रॉडला बळी पडणार नाहीत
लाभ कोणाला मिळेल: ग्राहकांचे नुकसान भरून काढण्यासाठी कंपनी फक्त मुंबईतील युजर्सना ही मोफत सेवा देणार आहे. कारण, संपूर्ण देशात नेटवर्क डाउनच्या समस्येला फक्त मुंबईच्याच वापरकर्त्यांना सामोरे जावे लागले होते आणि युजर्सना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ज्या यूजर्सला ही सुविधा दिली जात आहे. त्यांच्या सध्याच्या रिचार्ज पॅकमध्ये या मोफत सेवा जोडल्या जातील. म्हणजेच, ज्या दिवशी तुमच्या विद्यमान पॅकची वैधता कालबाह्य होईल. त्या दिवशी ती दोन दिवसांसाठी वाढवली जाईल. टेलिकॉम सेवेवर परिणाम झाल्यानंतर कंपनीने सर्व ग्राहकांची माफीही मागितली आहे. Jio ने सांगितले की, आमच्या टीमने काही तासांत ही नेटवर्क समस्या सोडवली. परंतु, हा तुमच्यासाठी चांगला अनुभव नव्हता हे आम्हाला समजते आणि आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत.
गेल्या शनिवारी दुपारी साधारण सव्वाबाराच्या सुमारास जिओचे नेटवर्क डाऊन व्हायला सुरुवात झाली. परिस्थिती लक्षात आणण्यासाठी अनेकांनी त्यांच्या पर्यायी सिम नेटवर्कद्वारे किंवा वाय-फाय कनेक्शनद्वारे सोशल मीडियाचा वापर केला. Jio मोबाईल नेटवर्किंग सेवेचा सर्व्हर डाउन असताना ट्विटरवर Memes चा अक्षरशः पूरच आला. नेटवर्क उपलब्ध नसण्याची तक्रार करणाऱ्यांपैकी बहुतांश मुंबई आणि परिसरातील होते. लोकांनी नाराजीचा इशारा देण्यासाठी संबंधित अधिकारी हँडलला टॅग करणे सुरु केले होते.
वाचा: जुन्या स्मार्टफोनमध्ये बदला 'या' सेटिंग्ज, फोन होईल नव्यासारखा, पाहा ट्रिक्स
वाचा: १ महिन्याकरिता फ्री सर्व्हिस किंवा WiFi राउटर, तुमच्या आवडीनुसार करा निवड, पाहा ACT चा 'हा' ब्रॉडबँड प्लान
वाचा:iPhone 13 झाला स्वस्त, हजारोंच्या डिस्काउंटसह आणा घरी, जाणून घ्या नवीन किंमत
लाभ कोणाला मिळेल: ग्राहकांचे नुकसान भरून काढण्यासाठी कंपनी फक्त मुंबईतील युजर्सना ही मोफत सेवा देणार आहे. कारण, संपूर्ण देशात नेटवर्क डाउनच्या समस्येला फक्त मुंबईच्याच वापरकर्त्यांना सामोरे जावे लागले होते आणि युजर्सना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ज्या यूजर्सला ही सुविधा दिली जात आहे. त्यांच्या सध्याच्या रिचार्ज पॅकमध्ये या मोफत सेवा जोडल्या जातील. म्हणजेच, ज्या दिवशी तुमच्या विद्यमान पॅकची वैधता कालबाह्य होईल. त्या दिवशी ती दोन दिवसांसाठी वाढवली जाईल. टेलिकॉम सेवेवर परिणाम झाल्यानंतर कंपनीने सर्व ग्राहकांची माफीही मागितली आहे. Jio ने सांगितले की, आमच्या टीमने काही तासांत ही नेटवर्क समस्या सोडवली. परंतु, हा तुमच्यासाठी चांगला अनुभव नव्हता हे आम्हाला समजते आणि आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत.
गेल्या शनिवारी दुपारी साधारण सव्वाबाराच्या सुमारास जिओचे नेटवर्क डाऊन व्हायला सुरुवात झाली. परिस्थिती लक्षात आणण्यासाठी अनेकांनी त्यांच्या पर्यायी सिम नेटवर्कद्वारे किंवा वाय-फाय कनेक्शनद्वारे सोशल मीडियाचा वापर केला. Jio मोबाईल नेटवर्किंग सेवेचा सर्व्हर डाउन असताना ट्विटरवर Memes चा अक्षरशः पूरच आला. नेटवर्क उपलब्ध नसण्याची तक्रार करणाऱ्यांपैकी बहुतांश मुंबई आणि परिसरातील होते. लोकांनी नाराजीचा इशारा देण्यासाठी संबंधित अधिकारी हँडलला टॅग करणे सुरु केले होते.
वाचा: जुन्या स्मार्टफोनमध्ये बदला 'या' सेटिंग्ज, फोन होईल नव्यासारखा, पाहा ट्रिक्स
वाचा: १ महिन्याकरिता फ्री सर्व्हिस किंवा WiFi राउटर, तुमच्या आवडीनुसार करा निवड, पाहा ACT चा 'हा' ब्रॉडबँड प्लान
वाचा:iPhone 13 झाला स्वस्त, हजारोंच्या डिस्काउंटसह आणा घरी, जाणून घ्या नवीन किंमत