नवी दिल्ली : आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं असून, प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे आहे. आता आधार जारी करणारी संस्था UIDAI ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. UIDAI ने एक सर्क्यूलर जारी करत सर्व मंत्रालय आणि राज्य सरकारला म्हटले आहे की, सरकारी सबसीडी व योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार नंबर अनिवार्य करण्यात यावा. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसल्यास सरकारी सबसीडी आणि योजनांचा लाभ मिळणार नाही. वाचाः अवघ्या ९९९ रुपयात भारतीय कंपनीचे शानदार इयरबड्स लाँच, पाहा फीचर्स
९९% लोकांकडे आहे आधार कार्ड
ज्या लोकांकडे आधार नंबर (Aadhaar Number) नाही व तरीही सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या सबसीडी आणि योजनांचा लाभ घेत आहे, अशांसाठी आधार नियम अधिक कठोर करण्यासंबंधी सर्क्यूलर जारी केले आहे. UIDAI नुसार, देशातील जवळपास ९९ टक्के लोकांकडे आधार नंबर उपलब्ध आहे. UIDAI ने जारी केलेल्या सर्क्यूलरनुसार, आधार कायद्याच्या कलम ७ नुसार, ज्या व्यक्तीकडे आधार नंबर नाही अथवा अद्याप देण्यात आलेला नाही, ती व्यक्ती आधार नोंदणी ओळख (ईआयडी) नंबर/पावतीद्वारे सरकारी लाभ, सबसीडी आणि सेवांचा फायदा घेऊ शकते.
वाचाः Fossil, Fastrack च्या स्मार्टवॉचला चक्क निम्म्या किंमतीत खरेदीची संधी, पाहा ऑफर
म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीकडे आधार नंबर नसल्यास केंद्र व राज्य सरकारच्या सेवा, योजना व सबसीडीचा फायदा घेण्यासाठी आधार नोंदणी (ईआयडी) क्रमांक अथवा पावती असणे आवश्यक आहे. Aadhaar मुळे विविध योजना व सेवांचा फायदा घेणे सोपे झाले आहे. तसेच, आधारमुळे सरकारी योजनांमध्ये होणारा भ्रष्टाचार, तसेच गरजूंपर्यंत न पोहचणारी मदत अशा गोष्टी कमी झाल्या आहेत.
वाचाः वर्षभर मोबाइल नंबर सुरू ठेवण्यासाठी उपयोगी येईल ‘हा’ प्लान, अवघ्या ७९७ रुपयात मिळेल ३६५ दिवसांची वैधता
९९% लोकांकडे आहे आधार कार्ड
ज्या लोकांकडे आधार नंबर (Aadhaar Number) नाही व तरीही सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या सबसीडी आणि योजनांचा लाभ घेत आहे, अशांसाठी आधार नियम अधिक कठोर करण्यासंबंधी सर्क्यूलर जारी केले आहे. UIDAI नुसार, देशातील जवळपास ९९ टक्के लोकांकडे आधार नंबर उपलब्ध आहे. UIDAI ने जारी केलेल्या सर्क्यूलरनुसार, आधार कायद्याच्या कलम ७ नुसार, ज्या व्यक्तीकडे आधार नंबर नाही अथवा अद्याप देण्यात आलेला नाही, ती व्यक्ती आधार नोंदणी ओळख (ईआयडी) नंबर/पावतीद्वारे सरकारी लाभ, सबसीडी आणि सेवांचा फायदा घेऊ शकते.
वाचाः Fossil, Fastrack च्या स्मार्टवॉचला चक्क निम्म्या किंमतीत खरेदीची संधी, पाहा ऑफर
म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीकडे आधार नंबर नसल्यास केंद्र व राज्य सरकारच्या सेवा, योजना व सबसीडीचा फायदा घेण्यासाठी आधार नोंदणी (ईआयडी) क्रमांक अथवा पावती असणे आवश्यक आहे. Aadhaar मुळे विविध योजना व सेवांचा फायदा घेणे सोपे झाले आहे. तसेच, आधारमुळे सरकारी योजनांमध्ये होणारा भ्रष्टाचार, तसेच गरजूंपर्यंत न पोहचणारी मदत अशा गोष्टी कमी झाल्या आहेत.
वाचाः वर्षभर मोबाइल नंबर सुरू ठेवण्यासाठी उपयोगी येईल ‘हा’ प्लान, अवघ्या ७९७ रुपयात मिळेल ३६५ दिवसांची वैधता