अ‍ॅपशहर

ओवाळू (अचूक) आरत्या!

'ऐक रे, संकष्टी पावावे नाही हा. संकटी पावावं म्हण आणि फळीवर वंदना काय म्हणतोस. एकदा नीट आरत्या वाचून या रे सगळ्यांनी' असे आदेश आता सगळेच देत आहेत.

Maharashtra Times 23 Aug 2017, 1:19 pm
'ऐक रे, संकष्टी पावावे नाही हा. संकटी पावावं म्हण आणि फळीवर वंदना काय म्हणतोस. एकदा नीट आरत्या वाचून या रे सगळ्यांनी' असे आदेश आता सगळेच देत आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून आरत्यांमधील या हमखास होणाऱ्या चुकांवरचा विनोद व्हायरल होतोय. खरंतर गणेशोत्सव हा सामूहिक आरती शिवाय जणू अपूर्णच वाटतो. पूजा संपते, सगळे एकत्र जमू लागतात. कुणी टाळ, कुणी झांज, कुणी घंटा अशी नानाविध शस्त्र हाती घेतात. गणपती बाप्पा मोरयाचा गजर कानी पडताच गर्दीतले हौशी तानसेन सज्ज होतात आणि एकाच जयघोषात सुरुवात होते ती आरतीला! पण या आरत्यांमधल्या अनेक शब्दांनी कालांतराने अपभ्रंश होऊन वेगळंच रूप धारण केलं आहे. मग अशा चुका विनोदाच्या माध्यमातून कानपिचक्या देऊन सुधारण्याची जणू मोहीमच सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ganpati aarti
ओवाळू (अचूक) आरत्या!


तसंच आरती म्हणतानाही अनेक तऱ्हा दिसून येतात. उदाहरणार्थ, 'जय देव जय देव'वर अंगातला सगळा जोर काढून भर देणं. 'येई हो विठ्ठले' मधला निढळावरी 'कर' या ओळीवर हमखास घेतला जाणारा ब्रेदलेस आलाप, हे सगळं 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' चीच प्रचिती देणारं. किती आरत्या म्हणाव्या यालाही काहीच बंधन नसतं. काही ठिकाणी अगदीच मोजक्या ४ ते ५ आरत्या म्हणून घालीन लोटांगणची वेळ येते तर कुठे आरत्यांनी दोन आकडी संख्या पार केलेली असते. आरती म्हणताना या अशा अनेक तऱ्हा दिसून येत असल्या तरी या सगळ्यामागे एक भावना मात्र कायम असते ती म्हणजे लाडक्या दैवताप्रती भक्तीभाव! जो दहाही दिवस उत्तरोत्तर वाढतच जातो, अगदी विसर्जन आधीची शेवटची आरती म्हणेपर्यंत
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज