अ‍ॅपशहर

जवाहर ग्राम समृद्धी योजना म्हणजे काय, या योजनेचा लाभ कसा घेता येणार?

जवाहर रोजगार योजनेस (JRY) अधिक प्रभावी आणि व्यावहारिक बनविण्याच्या दृष्टीने जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये मागणी आधारित सुविधा उभारून शाश्वत मालमत्ता उभारणे व निरंतर रोजगार उपलब्ध करणारी कायमस्वरूपी साधनसामग्री तयार करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली.

guest Shrikant-Londhe | Lipi 22 Aug 2022, 1:47 pm
जवाहर रोजगार योजनेस (JRY) अधिक प्रभावी आणि व्यावहारिक बनविण्याच्या दृष्टीने जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये मागणी आधारित सुविधा उभारून शाश्वत मालमत्ता उभारणे व निरंतर रोजगार उपलब्ध करणारी कायमस्वरूपी साधनसामग्री तयार करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jawahar gram samridhi scheme benefits


जवाहर ग्राम समृद्धी योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ७५:२५ टक्के आर्थिक सहभागातून सुरू करण्यात आली.

जवाहर ग्राम समृद्धी योजना आधीच्या जवाहर रोजगार योजनेचे पुनर्गठन व सुधारित व अधिक व्यापक आवृत्ती आहे. यामध्ये पायाभूत सुविधांचे निर्माण करणे, सामुदायिक संपत्तीचे निर्माण आणि त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती सामील आहे. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील लोकांना प्राधान्य दिले जाते. केंद्र सरकारची ही जवाहर ग्राम समृद्धि योजना पूर्णपणे ग्राम पंचायत स्तरावर लागू केली जात आहे. जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी (DRDAs) / जिल्हा परिषदांना (ZPs) ग्राम पंचायतींच्या विकासासाठी निधी पुरवठा केला जातो.

जवाहर ग्राम समृद्धी योजना (Jawahar Gram Samridhi Yojana)

जवाहर ग्राम समृद्धी योजना (JGSY) जवाहर रोजगार योजनेचे व्यापक रुप आहे. ही योजना एक एप्रिल १९९९ रोजी लाँच करण्यात आली. ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी व त्यांच्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्यासाठी या योजनेचे निर्मिती करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात बेरोजगार गरीबांसाठी कायम रोजगार आणि पूरक रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे. स्थानिक संसाधनांचे स्त्रोत टिकवण्यासाठी मागणी आधारित पुरवठा प्रणाली विकसित करणे. गावातील पायाभूत सुविधांचा विकास व निर्माण करणे, . योजनेत अंतर्भूत आहे. गावात राहणारे लोक Jawahar Gram Samridhi Yojana (JGSY) साठी लाभार्थी समुहाची निवड करतात. दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणारे व शारीरिक रूपाने दिव्यांग व्यक्ती त्याचबरोबर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.

या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामपंचायतींवर असते. ग्राम पंचायत वार्षिक कार्य योजना तयार करते व त्याला ग्राम सभेची मंजुरी मिळाल्यानंतर योजना लागू केली जाते. एसजी / एसटी समाजासाठी वैयक्तिक लाभार्थी योजनांसाठी २२.५ टक्के जेजीएसवाय फंड राखीव असतो. दिव्यांगासाठी या योजनेत तीन टक्के निधी कोटा राखीव ठेवला जातो.

राज्य सरकार जेजीएसवाय अंतर्गत मजुरीचा दर निश्चित करते. ग्राम पंचायतींकडे ग्राम सभेच्या मंजुरीने ५० हजार रुपयांपर्यंतची कामे व योजनेची अंमलबाजावणी करण्याचा अधिकार आहे. दरम्यान ग्राम सभेच्या मंजुरीनंतर ५० हजार रुपयांहून अधिक खर्चाची कामे, योजनांसाठी ग्राम पंचायत पचायत समिती व जिल्हा परिषदांकडे जाईल व त्याला प्रशासकीय मंजुरी मिळवेल. एका वर्षात प्रशासकीय खर्च, आकस्मिकता आणि तांत्रिक कामांसाठी ग्रामपंचायती ७,५०० किंवा ७.५ टक्के निधी खर्च करू शकते.

या योजनेत ग्राम पंचायतींना सध्या १०,००० रुपयांच्या मर्यादेविना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी पुरवला जातो. DRDA / ZP / पंचायत समित्या यासाठी मार्गदर्शन करतात. समन्वय, पर्यवेक्षण, निरीक्षण व कामांचा आढावा घेणे हे पंचायत समिती व जिल्हा परिषदांचे काम आहे.

जवाहर ग्राम समृद्धि योजनेचे पुनर्गठन -

जवाहर रोजगार योजनेला (JRY) अधिक प्रभावी व व्यापक बनवण्यासाठी १ एप्रिल १९९९ रोजी या योजनेचे पुनर्गठन करून याचे नाव बदलण्यात आले. याचे नाव जवाहर ग्राम समृद्धि योजना(JGSY) ठेवण्यात आले.

जेजीएसवायचा प्राथमिक उद्देश्य ग्रामीण स्तरावर शाश्वत संपत्ति सह पुरवठाधारित ग्रामीण स्तरावर पायभूत सुविधांचे निर्माण करणे. जेणेकरून ग्रामीण गरीबांना कायम रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील.

माध्यमिक उद्देश्य ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगार गरीबांसाठी पूरक रोजगार निर्माण करणे. या कार्यक्रमानुसार दारिद्र्य रेषेखालील लोकांना मजुरी दिली जाते.

JGSY अंतर्गत प्रादेशिक भेदभाव केला जात नाही. वार्षिक मंजूर निधीपैकी साडे बावीस टक्के रक्कम अनुसूचित जाति / अनुसूचित जमातीच्या लाभार्थी योजनांवर खर्च केला जातो. ३ टक्के रक्कम दिव्यांगाना बाधा मुक्त पायाभूत सुविधांच्या निर्माणसाठी खर्च केली जाते. या योजनेचा एक अन्य उद्देश्य बेरोजगार ग्रामीण गरीबांसाठी पूरक रोजगार उत्पन्न करणे आहे.

जवाहर ग्राम समृद्धी योजना ( Jawahar Gram Samridhi Yojana) उद्देश्य -

जवाहर ग्राम समृद्धि योजना (JGSY) पूर्ववर्ती जवाहर रोजगार योजना (JRY) योजनेचे विस्तारीत व व्यापक रुप आहे. १ एप्रिल १९९९ रोजी ही योजना लागू करण्यात आली. ग्रामीण गरीबांचे जीवनमान उंचावणे व त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी ही योजना निर्माण करण्यात आली आहे. गावपातळीवर शाश्वत मालमत्ता आणि मालमत्ता सक्षम करण्यासाठी संवादात्मक सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण करणे हा योजनेचा प्राथमिक उद्देश आहे. या योजनेंतर्गत बिहार राज्यातील ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या रोजगाराच्या संधी वाढवल्या आहेत.

जवाहर ग्राम समृद्धि योजनेचे लाभ –

JGSY चे प्राथमिक उद्दिष्ट ग्रामीण स्तरावर टिकाऊ मालमत्तेसह मागणीवर आधारित ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण करणे, ग्रामीण गरिबांना रोजगाराच्या संधी शाश्वतपणे वाढविण्यास सक्षम करणे हे आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार गरीबांसाठी पूरक रोजगार निर्मिती हे दुय्यम उद्दिष्ट आहे.

जवाहर ग्राम समृद्धि योजनेसाठी ( Jawahar Gram Samridhi Yojana) पात्रता

ही योजना पूर्णपणे ग्राम पंचायत पातळीवर लागू केली जाते. या योजनेसाठी ग्राम पंचायतींकडे अधिकार आहे. देशातील सर्व राज्यातील ग्रामीण भाग या योजनेसाठी पात्र आहे. राज्यातील गरीब लाभार्थ्याला या योजनेंतर्गत मजुरी प्रदान केली जाईल.

जवाहर ग्राम समृद्धि योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? (How to Apply:- Jawahar Gram Samridhi Yojana Application form )

  • जवाहर ग्राम समृद्धि योजनेसाठी (Jawahar Gram Samridhi Yojana) अर्ज करण्यासाठी Application Form भरावा लागेल. त्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • Jawahar Gram Samridhi Yojana मध्ये अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ऑफिशियल वेबसाइट वर तुमचे खाते तयार करावे लागेल.
  • जवाहर ग्राम समृद्धि योजनेसाठी (Jawahar Gram Samridhi Yojana) अकाउंट तयार करण्यासाठी वेबसाईटवर रजिस्ट्रेंशन या लिंक वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर एक नवीन पेज तमुच्यासमोर ओपन होईल, त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
  • JGSY Online Form भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमचे योजनेच्या ऑफिशियल वेबसाइटवर तयार होईल.
  • अकाउंट बनल्यानंतर तमुच्या (JGSY Login) अकाउंटवरून लॉग इन करावे लागेल व तुम्हाला पीक विमा योजनाचा फॉर्म भरावा लागेल.
  • जवाहर ग्राम समृद्धी योजना Application Form, पीक विमा योजनाचा फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर सक्सेसफुल असा मेसेज येईल.

महत्वाचे लेख