अ‍ॅपशहर

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, वैशिष्टेय व पात्रता

मागासवर्गीय समाजातील मुलींचे प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कधी करण्याच्या हेतूने इ.५ वी ते इ.७ वीतील मुलींसाठी १९९५-९६ पासून शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरु करण्यात आली. त्याच धर्तीवर इ.८ वी ते इ. १० वी मधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने २००३-०४ सालापासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

guest Shrikant-Londhe | Edited byरसिका कंक | Lipi 12 Apr 2022, 11:21 pm
मागासवर्गीय समाजातील मुलींचे प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कधी करण्याच्या हेतूने इ.५ वी ते इ.७ वीतील मुलींसाठी १९९५-९६ पासून शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरु करण्यात आली. त्याच धर्तीवर इ.८ वी ते इ. १० वी मधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने २००३-०४ सालापासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत इ.८ वी ते इ. १० वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असे दहा महिने रुपये १०० /- प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते.या शिष्यवृत्ती योजनेमुळे ग्रामीण भागातील दलित विद्यार्थीनीला दरमहा रु.१०० /- मिळणार आहेत. ज्या घरात मुलगी म्हणजे ओझे समजले जाते अशा घरात तिला आता न्याय मिळू शकेल. मुलींचे सक्षमीकरण कारणे हा या योजनेमागचा हेतू आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम savitribai phule scholarship scheme
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, वैशिष्टेय व पात्रता


शिष्‍यवृत्‍तीसाठी अटी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित,विनानुदानित, माध्यमिक शाळेतील इ.८ वी ते इ. १० वी च्या मुलींसाठी असून ती गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यतिरिक्त राहील. यासाठी मागासवर्गीय मुलींना उत्पन्नाची अट राहणार नाही. परंतु शाळेतील उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे. उपस्थितीनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी मुलींना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

योजनेचा उद्देश -
शासन निर्णय दिनांक १२ जानेवारी, १९९६ अन्वये मागास समाजातील विद्यार्थिनींसाठी व शासन निर्णय दिनांक २९ ऑक्टोबर, १९९६ पासून विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सुध्दा लागू करण्यात आली आहे. सदर प्रवर्गाच्या विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव -
विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग.

योजनेच्या प्रमुख अटी
विद्यार्थीनी विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावी.
विद्यार्थीनी इ. ५ वी ते ७ वी मध्ये शिकणारी असावी.
विद्यार्थीनी ही शासन मान्य शाळेत नियमित शिकणारी असावी.

योजनेचे स्वरुप -
इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इ. ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने अनुक्रमे सन १९९६ व २००३ पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. इयत्ता, शिष्यवृत्ती दर व कालावधी.
५ वी ते ७ वी दरमहा ६० रुपये प्रमाणे १० महिन्याचे ६०० रुपये.
८ वी ते १० दरमहा १०० रुपये प्रमाणे १० महिन्याचे १००० रुपये अदा केले जातात.

नियम, अटी व पात्रता इ. :
उत्पन्न व गुणाची अट नाही.
संबंधित शाळेच्या मुख्याणद्यापकांनी विद्यार्थ्यांबचे अर्ज ऑनलाईन भरणे आवश्येक.
७५% उपस्थिती असल्यास शाळेने प्रस्ताव विहीत कालावधीत सादर करावा.
लाभधारक मुलगी शासनमान्य शिक्षण संस्थेत नियमित शिकत असावी. सदर शिष्यवृत्तीची रक्कम त्या त्या मुलींच्या बँकेतील खात्यामध्ये/ ऑनलाईन जमा करण्याषत येते.

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

प्रति विद्यार्थीनीस दरमाह रुपये ६०/- याप्रमाणे १० महिन्या करीता रु.६००/- शिष्यवृत्तीची रक्कम संबंधीत लाभार्थ्यांस अदा केली जाते.

अर्ज करण्याची पध्दत
सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावेत.

संपर्क कार्यालयाचे नाव
संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/ उपनगर.
संबंधित शाळांचे मुख्याध्यापक.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज