अ‍ॅपशहर

हरामखोर

Maharashtra Times 13 Jan 2017, 1:56 am
‘हरामखोर’ हा सिनेमा मुलींच्या शोषणावर बोलतो. मानसिक, शारिरीक अशा दोन्हीचा यात समावेश आहे. एक सरळ साधी गोष्ट घेऊन, दिग्दर्शकाने त्याभोवती कहाणी मांडली आहे. ही कहाणी समजते.. कळते. पण, ती भिडत नाही. आत घुसत नाही. त्यामुळे हे वास्तव ‘दाहक’ होत नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम haramkhor
हरामखोर


वयाच्या नाजूक टप्प्यावर प्रत्येकाला एक आधार हवा असतो. मुलांपेक्षा मुलींना अशा आधाराची गरज जास्त असते. कुणीतरी आपलं.. आपलं ऐकणारं.. मानसिक, शारिरीक बदल समजून घेणार.. समजावून सांगणारं कोणीतरी हवं असतं. अशा वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर मुलींचं स्वच्छंदी फुलपाखरु व्हायला वेळ लागत नाही. परंतु, प्रत्येकवेळी असं सांगणारं कुणी असेल याची शाश्वती देता येत नाही. किंबहुना दैनंदिन जगण्यात मुलींच्या आजुबाजूला असणाऱ्या लोकांकडूनच घात होण्याची शक्यता जास्त असते. या चित्रपटातून दिग्दर्शकाला हेच वास्तव मांडायचं आहे.

संध्या ही जेमतेम १५ वर्षांची मुलगी बाबांसोबत रहाते. आई आणि बाबांचं भांडण झाल्यामुळे आई दुसरीकडे रहाते. संध्याला जवळचं असं कोणी नाही. पोलिस असलेले वडील सतत दारुत बुडालेले. अशात वडिलांचे दुसऱ्या एका मैत्रिणीसोबत असलेले संबंध संध्याला समजतात. ती आणखी कोमेजते. अशावेळी वर्गात शिकवणारे श्याम हे शिक्षक तिला जवळचे वाटतात. संध्या हुशार, चुणचुणीत असल्यामुळे श्यामचंही संध्याकडे विशेष लक्ष आहे. अशातच संध्याला आधार गवसतो आणि श्यामलाही ‘नवं’ काहीतरी गवसतं. या नात्याला घेऊन ही गोष्ट पुढे जाते.

श्याम आणि संध्याचं नातं दाखवतानाच, संध्याच्या मागे आणखीही दोन मुलं असतात. मिंटू आणि कमल. या ट्रॅकमधून दिग्दर्शकाने पौगंडावस्थेत असलेल्या समजुतींचा, इच्छांचा गमतीदार वापर केला आहे. अर्थात, श्याम आ​णि संध्याची ही प्रेमकहाणी नाही. पावलोपावली संध्यासमोर कळत नकळत वाढून ठेवलेलं शोषण यातल्या प्रसंगांतून दिसतं. पण, तरीही या चित्रपटात रडारड नाही. कारण, इथे कुणीच मुद्दाम काही करत नाहीय. पण अशावेळी स्वतःवर ठेवायच्या संयमाबाबत चित्रपट बोलतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज