मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमध्ये लेफ्टनंट उमर फैयाज यांच्या हत्येविरुद्ध राजधानीत इंडिया गेट येथे आज संध्याकाळी कँडल मार्च काढण्यात आला. जवाहर नवोदय विद्यालयाच्या दिल्ली-एनसीआरमध्ये राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी कँडल मार्चचे आयोजन केले होते. फैयाज हे २००५ ते २०१२ या कालावधीत नवोदयचेच विद्यार्थी होते अशी माहिती ऑल इंडिया जवाहर नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
फयाज यांच्या स्मृती जागवण्यासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये नवोदयच्या माजी विद्यार्थ्यांनी कँडल मार्चचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या या कँडल मार्चमध्ये विविध वयोगटातील, सामान्यांपासून ते व्हीआयपीपर्यंत असे विविध स्तरातील नागरिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात संरक्षण विशेषज्ञ आणि सोसायटी ऑर पॉलिसी स्टडीजचे संचालक सी. उदय भास्कर देखील उपस्थित होते. उत्स्फुर्तपणे निघालेल्या या कँडलमार्चमुळे देशात काय वातावरण आहे याचे दर्शन घडते अशी प्रतिक्रिया सी. उदय भास्कर यांनी व्यक्त केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी फयाज यांची हत्या केली होती. फैयाज यांच्या हत्येमागे हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे बोलले जात आहे. काश्मिरी शेतकऱ्याचे पुत्र असलेले फैयाज हे डिसेंबर २०१६ मध्ये लष्करी सेवेत रुजू झाले होते.
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून (एनडीए) प्रशिक्षण घेतलेल्या फयाज यांना १० डिसेंबर २०१६ ला लष्करात कमिशन मिळाले होते. ते १२९ व्या तुकडीचे कॅडेट होते. फयाज २ राजपूताना रायफल्समध्ये तैनात झाले होते. ते आपल्या चुलत भावाच्या लग्नासाठी रजेवर होते. ते २५ मेला अखनूर क्षेत्रात असलेल्या आपल्या तुकडीत परतणार होते. परंतु, हे लग्न त्यांच्या आयुष्यातील शेवटचे लग्न ठरले.
जम्मू-काश्मीरमध्ये लेफ्टनंट उमर फैयाज यांच्या हत्येविरुद्ध राजधानीत इंडिया गेट येथे आज संध्याकाळी कँडल मार्च काढण्यात आला. जवाहर नवोदय विद्यालयाच्या दिल्ली-एनसीआरमध्ये राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी कँडल मार्चचे आयोजन केले होते. फैयाज हे २००५ ते २०१२ या कालावधीत नवोदयचेच विद्यार्थी होते अशी माहिती ऑल इंडिया जवाहर नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
फयाज यांच्या स्मृती जागवण्यासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये नवोदयच्या माजी विद्यार्थ्यांनी कँडल मार्चचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या या कँडल मार्चमध्ये विविध वयोगटातील, सामान्यांपासून ते व्हीआयपीपर्यंत असे विविध स्तरातील नागरिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात संरक्षण विशेषज्ञ आणि सोसायटी ऑर पॉलिसी स्टडीजचे संचालक सी. उदय भास्कर देखील उपस्थित होते. उत्स्फुर्तपणे निघालेल्या या कँडलमार्चमुळे देशात काय वातावरण आहे याचे दर्शन घडते अशी प्रतिक्रिया सी. उदय भास्कर यांनी व्यक्त केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी फयाज यांची हत्या केली होती. फैयाज यांच्या हत्येमागे हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे बोलले जात आहे. काश्मिरी शेतकऱ्याचे पुत्र असलेले फैयाज हे डिसेंबर २०१६ मध्ये लष्करी सेवेत रुजू झाले होते.
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून (एनडीए) प्रशिक्षण घेतलेल्या फयाज यांना १० डिसेंबर २०१६ ला लष्करात कमिशन मिळाले होते. ते १२९ व्या तुकडीचे कॅडेट होते. फयाज २ राजपूताना रायफल्समध्ये तैनात झाले होते. ते आपल्या चुलत भावाच्या लग्नासाठी रजेवर होते. ते २५ मेला अखनूर क्षेत्रात असलेल्या आपल्या तुकडीत परतणार होते. परंतु, हे लग्न त्यांच्या आयुष्यातील शेवटचे लग्न ठरले.