नवी दिल्ली :
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुषमान भारत-राष्ट्रीय आरोग्य संरक्षण मोहीमे’ची (एबी-एनएचपीएम) अंमलबजावणी करताना सुमारे १० हजार नवीन नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या योजनेअंतर्गत १० कोटी गरीब कुटुंबांना वार्षिक पाच लाखांचे आरोग्य सुरक्षाकवच पुरवण्याचा सरकारचा मानस आहे.
‘एबी-एनएचपीएम’ योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकारी व खासगी रुग्णालयांत सुमारे एक लाख ‘आयुषमान मित्र’ नेमण्यात येणार आहेत. यासाठी आरोग्य मंत्रालय आणि कौशल्यविकास मंत्रालयात करार झाला आहे. हे ‘आयुषमान मित्र’ रुग्णांना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधांची माहिती देतील. तसेच लाभार्थी व रुग्णालयात समन्वय साधतानाच मदतकक्षाद्वारे लाभार्थींची कागदपत्रे व पात्रतेची पडताळणी करतील, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
२०१८च्या अर्थसंकल्पात ‘एबी-एनएचपीएम’ची घोषणा करण्यात आली होती. ही जगातली सर्वांत मोठी सरकारी अनुदानित आरोग्यसेवा योजना असल्याचा दावा केला जात आहे.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुषमान भारत-राष्ट्रीय आरोग्य संरक्षण मोहीमे’ची (एबी-एनएचपीएम) अंमलबजावणी करताना सुमारे १० हजार नवीन नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या योजनेअंतर्गत १० कोटी गरीब कुटुंबांना वार्षिक पाच लाखांचे आरोग्य सुरक्षाकवच पुरवण्याचा सरकारचा मानस आहे.
‘एबी-एनएचपीएम’ योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकारी व खासगी रुग्णालयांत सुमारे एक लाख ‘आयुषमान मित्र’ नेमण्यात येणार आहेत. यासाठी आरोग्य मंत्रालय आणि कौशल्यविकास मंत्रालयात करार झाला आहे. हे ‘आयुषमान मित्र’ रुग्णांना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधांची माहिती देतील. तसेच लाभार्थी व रुग्णालयात समन्वय साधतानाच मदतकक्षाद्वारे लाभार्थींची कागदपत्रे व पात्रतेची पडताळणी करतील, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
२०१८च्या अर्थसंकल्पात ‘एबी-एनएचपीएम’ची घोषणा करण्यात आली होती. ही जगातली सर्वांत मोठी सरकारी अनुदानित आरोग्यसेवा योजना असल्याचा दावा केला जात आहे.