नवी दिल्लीः महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस आणि पुराने काही जिल्ह्यांमध्ये भीषण स्थिती निर्माण झाली होती. खासकरून रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूरला मोठा फटका बसला. आता केंद्र सरकारने मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला केंद्र सरकारने १०० कोटींची मदत घोषित केली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी ( nitin gadkari ) ही घोषणा केली आहे.
मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रस्ते वाहून गेले. अनेक गावांना पुराचा तडाख बसला आहे. आता या भागांमधील रस्ते दुरुस्तीसाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी १०० कोटींची मदत जाहीर केली आहे.
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे कोकणात चिपळूणजवळ वशिष्टी नदीवरील पुलाचे आणि मुंबई-गोवा महामार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ७२ तासांत दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत केली गेली, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
ravi kumar dahiya : कुस्तीपटू रवी कुमार दहियाला हरयाणा सरकारचे ४ कोटींचे बक्षीस आणि क्लास-१ पदा
पावसाचा तडाखा बसलेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील रस्ते दुरुस्तीसाठी तातडीने पावलं उचलण्यात आली आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी केंद्राने १०० कोटीं मंजूर केले आहेत, असं गडकरी म्हणाले. यात ५२ कोटी रुपये हे तात्पुरत्या डागडुजीसाठी आणि ४८ कोटी रुपये हे कामय स्वरुपी दुरुस्तीसाठी देण्यात आली आहेत, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
pegasus supreme court : 'PM मोदी, शहांना नोटीस बजावणार नाही', पेगाससवरून सुप्रीम कोर्टाने वकीलांना सुनावलं
पावसाचा फटका बसलेल्या परशुराम घाट, करूळ घाट, आंबा घाट भागातील दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या भागात तात्पुरत्या स्वरुपाचे काम आधीच सुरू करण्यात आले आहे. तसंच कायम स्वरुपी दुरुस्तीचे कामही प्राधान्याने केले जाईल, असं नितीन गडकरी म्हणाले.
मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रस्ते वाहून गेले. अनेक गावांना पुराचा तडाख बसला आहे. आता या भागांमधील रस्ते दुरुस्तीसाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी १०० कोटींची मदत जाहीर केली आहे.
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे कोकणात चिपळूणजवळ वशिष्टी नदीवरील पुलाचे आणि मुंबई-गोवा महामार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ७२ तासांत दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत केली गेली, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
ravi kumar dahiya : कुस्तीपटू रवी कुमार दहियाला हरयाणा सरकारचे ४ कोटींचे बक्षीस आणि क्लास-१ पदा
पावसाचा तडाखा बसलेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील रस्ते दुरुस्तीसाठी तातडीने पावलं उचलण्यात आली आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी केंद्राने १०० कोटीं मंजूर केले आहेत, असं गडकरी म्हणाले. यात ५२ कोटी रुपये हे तात्पुरत्या डागडुजीसाठी आणि ४८ कोटी रुपये हे कामय स्वरुपी दुरुस्तीसाठी देण्यात आली आहेत, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
pegasus supreme court : 'PM मोदी, शहांना नोटीस बजावणार नाही', पेगाससवरून सुप्रीम कोर्टाने वकीलांना सुनावलं
पावसाचा फटका बसलेल्या परशुराम घाट, करूळ घाट, आंबा घाट भागातील दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या भागात तात्पुरत्या स्वरुपाचे काम आधीच सुरू करण्यात आले आहे. तसंच कायम स्वरुपी दुरुस्तीचे कामही प्राधान्याने केले जाईल, असं नितीन गडकरी म्हणाले.