अ‍ॅपशहर

या राज्याचा आकडा महाराष्ट्राच्याही जवळ; पुन्हा १०२ रुग्ण सापडले

तामिळनाडूने करोनावर अत्यंत यशस्वीपणे नियंत्रण मिळवल्याचं चित्र होतं. पण गेल्या दोन दिवासत तामिळनाडूमधील आकडे १०० च्या पटीने वाढत आहेत. तामिळनाडूमध्ये एकूण ४११ करोनाबाधित झाले आहेत. महाराष्ट्रातील आकडा हा ४२३ आहे. त्यामुळे देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्राच्या जवळ आणखी एक राज्य आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Apr 2020, 6:10 pm
चेन्नई : तामिळनाडूमधील करोनाबाधितांचा आकडा १०० च्या पटीनेच वाढत आहे. आज पुन्हा एकदा १०२ रुग्ण करोनाबाधित आढळले असून राज्याचा एकूण आकडा ४११ झाला आहे. देशात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण असलेल्या महाराष्ट्राच्या जवळपास पोहोचणारं तामिळनाडू हे दुसरं राज्य ठरलं आहे. महाराष्ट्रात सध्या ४२३ रुग्ण आहेत. तामिळनाडूमध्ये आढळलेले बहुतांश रुग्ण हे दिल्लीतील निझामुद्दीनमध्ये झालेल्या तबलिघी जमातच्या कार्यक्रमाशी संबंधित आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corona patients


तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सी विजयभास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध रुग्णालयातील १५८० बाधित आणि संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

करोना: पोलिसाचा मृत्यू झाल्यास ५० लाख भरपाई

तामिळनाडूची आकडेवारी -

एकूण चाचण्या - ३६८४
निगेटिव्ह रिपोर्ट - २७८९
पॉझिटिव्ह रिपोर्ट - ४११
डिस्चार्ज - ०७
प्रक्रिया सुरू - ४८४

करोना :टाटांनी उघडली 'ताज हाॅटेल'ची कवाडे

महाराष्ट्रातील आणि देशातील परिस्थिती

देशातील सर्वाधिक करोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात एकूण ४२३ जण करोनाबाधित असून यापैकी ४२ जणांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर २४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर देशातील आकडा हा २३०१ झाला आहे. देशात आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५७ जणांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहेत.

६०० पेक्षा जास्त तबलिघी आतापर्यंत करोनाबाधित

देशभरातील तबलिघी जमातच्या दोन दिवसांतील करोना रुग्णांची संख्या ही ६४७ इतकी झाली आहे. हे रुग्ण देशातील १४ राज्यांमध्ये आहेत. दिल्ली, आसाम, हिमाचल प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगण, उत्तराखंड आणि अनंदमान-निकोबारमध्ये हे तबलिघीचे रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

चीनः 'या' तंत्रज्ञानाच्या वापराने करोनाला रोखले

तबलिघींच्या कार्यक्रमामुळे करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आंध्र प्रदेशात एकूण १६२ रुग्णांपैकी १४० रुग्ण हे तबलिघी कार्यक्रमाशी संबंधित आहेत. देशातील एकूण आकडा हा २३०१ वर पोहोचला आहे. पर्यटक व्हिजावर येऊन अनेक देशातील तबलिघींनी धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे गृह मंत्रालय आता आक्रमक झालं आहे. तबलिघी जमातच्या ९६० परदेशी कार्यकर्त्यांना केंद्र सरकारने ब्लॅकलिस्ट केलं आहे. यात ४ अमेरिकन, ब्रिटन ९ आणि चीनच्या ६ नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांचे पर्यटन व्हिजा रद्द करण्यात आले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज