जम्मू: लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वैष्णोदेवी मंदिरात (Vaishno Devi Shrine Stampede) नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडली आहे. दर्शनासाठी झालेल्या गर्दीमुळं अचानक चेंगराचेंगरी होऊन १२ भाविकांचा मृत्यू झाला आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेत २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना देवस्थानच्या नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
नव्या वर्षाचे स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी वैष्णो देवी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास तरुण भाविकांच्या दोन समूहात वाद झाला. हा वाद चिघळून हाणामारी सुरू झाली. त्यामुळं घाबरून पळापळ सुरू झाली आणि हा अपघात घडला, अशी माहिती स्थानिक खासदार जुगल किशोर यांनी दिली आहे.
वाचा: वैष्णोदेवी मंदिरात नेमकं काय घडलं? का झाली चेंगराचेंगरी?
वैष्णोदेवी मंदिरातील घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान निधीतून मृतांच्या नातलगांना प्रत्येकी २ लाख रुपये व जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचीही घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. तसेच, या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. या घटनेबद्दल जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा करून संपूर्ण माहिती घेतली आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असं शहा यांनी म्हटलं आहे.
नव्या वर्षाचे स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी वैष्णो देवी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास तरुण भाविकांच्या दोन समूहात वाद झाला. हा वाद चिघळून हाणामारी सुरू झाली. त्यामुळं घाबरून पळापळ सुरू झाली आणि हा अपघात घडला, अशी माहिती स्थानिक खासदार जुगल किशोर यांनी दिली आहे.
वाचा: वैष्णोदेवी मंदिरात नेमकं काय घडलं? का झाली चेंगराचेंगरी?
वैष्णोदेवी मंदिरातील घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान निधीतून मृतांच्या नातलगांना प्रत्येकी २ लाख रुपये व जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचीही घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. तसेच, या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. या घटनेबद्दल जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा करून संपूर्ण माहिती घेतली आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असं शहा यांनी म्हटलं आहे.