>> भारती जैन । टाइम्स वृत्त
नौदल, तटरक्षक दल, एनएसजी, महाराष्ट्र एटीएस आणि स्थानिक पोलीस या सगळ्यांनी उरणमध्ये 'चप्पा चप्पा छान मारल्या'नंतरही कुणीच संशयित कसा सापडला नाही, असा प्रश्न गेले अनेक दिवस सगळ्यांनाच पडलाय ना?... त्याचं उत्तर आता सापडलं आहे.
उरणमधील १२ वर्षीय मुलीच्या अचाट कल्पनेतून हे सगळे संशयित अवतरले होते. ते प्रत्यक्षात नव्हतेच. केवळ 'थ्रील' अनुभवण्यासाठी तिने ही अफवा पसरवली होती, अशी धक्कादायक, आश्चर्यकारक आणि संतापजनक माहिती एका वरिष्ठ तपास अधिकाऱ्यानं दिली आहे. आपली चूक, खोटेपणा कबूल केल्यानंतर या मुलीला समज देऊन सोडण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं.
पठाणी पेहेरावातील चार-पाच व्यक्ती आपण पाहिल्या, त्या वेगळ्याच भाषेत काहीतरी बोलत होत्या आणि त्यांच्या हातात शस्त्रासारखं काहीतरी होतं, अशी वर्दी उरणमधील एका शालेय विद्यार्थिनीनं गेल्या गुरुवारी पोलिसांना दिली होती. त्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या आणि अनेक ठिकाणी 'हाय अॅलर्ट' देण्यात आला होता.
उरी येथील दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्याची घटना चारच दिवसांपूर्वी घडली होती. त्यामुळे एनएसजी कमांडोंपासून सगळी यंत्रणा काही तासांत उरणमध्ये पोहोचली होती आणि त्यांनी अख्खं गाव, किनाऱ्याचा कानाकोपरा तपासला होता. पण, कुणीच सापडलं नव्हतं. त्यामुळे संशयितांबद्दल आणखी माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी त्या विद्यार्थिनीला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावलं. तेव्हा, आपण हे सगळं थ्रील अनुभवण्यासाठी केलं होतं, असा खुलासा तिनं केला. तो ऐकून पोलिसांना काय करावं, हेच कळेनासं झालं.
काही दिवसांपूर्वी या मुलीनं ISच्या दहशतवाद्यांचे फोटो पाहिले होते. काळ्या कपड्यांतील त्या दहशतवाद्यांकडे ऑटोमॅटिक रायफल्स होत्या. त्यातूनच तिची विचारचक्र फिरली होती आणि ही अशी माणसं आपण उरणमध्ये पाहिल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं होतं. तिच्या या म्हणण्याला आणखीही काही विद्यार्थ्यांनी दुजोरा दिल्यानं सुरक्षा यंत्रणांनी 'मिशन उरण' हाती घेतलं होतं. आता, या विद्यार्थ्यांनी नेमकं कुणाला पाहिलं, की तेही कपोलकल्पित गोष्ट सांगत होते, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, कुठल्याही अॅलर्टकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. हे दुर्लक्ष महागात पडू शकतं. दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी जनतेची सावधगिरी हे महत्त्वाचं अस्त्र आहे. हे ओळखून नागरिकांनी अफवा किंवा चुकीची माहिती पसरवू नये, असं आवाहन सुरक्षा अधिकाऱ्यानं केलं आहे.
नौदल, तटरक्षक दल, एनएसजी, महाराष्ट्र एटीएस आणि स्थानिक पोलीस या सगळ्यांनी उरणमध्ये 'चप्पा चप्पा छान मारल्या'नंतरही कुणीच संशयित कसा सापडला नाही, असा प्रश्न गेले अनेक दिवस सगळ्यांनाच पडलाय ना?... त्याचं उत्तर आता सापडलं आहे.
उरणमधील १२ वर्षीय मुलीच्या अचाट कल्पनेतून हे सगळे संशयित अवतरले होते. ते प्रत्यक्षात नव्हतेच. केवळ 'थ्रील' अनुभवण्यासाठी तिने ही अफवा पसरवली होती, अशी धक्कादायक, आश्चर्यकारक आणि संतापजनक माहिती एका वरिष्ठ तपास अधिकाऱ्यानं दिली आहे. आपली चूक, खोटेपणा कबूल केल्यानंतर या मुलीला समज देऊन सोडण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं.
पठाणी पेहेरावातील चार-पाच व्यक्ती आपण पाहिल्या, त्या वेगळ्याच भाषेत काहीतरी बोलत होत्या आणि त्यांच्या हातात शस्त्रासारखं काहीतरी होतं, अशी वर्दी उरणमधील एका शालेय विद्यार्थिनीनं गेल्या गुरुवारी पोलिसांना दिली होती. त्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या आणि अनेक ठिकाणी 'हाय अॅलर्ट' देण्यात आला होता.
उरी येथील दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्याची घटना चारच दिवसांपूर्वी घडली होती. त्यामुळे एनएसजी कमांडोंपासून सगळी यंत्रणा काही तासांत उरणमध्ये पोहोचली होती आणि त्यांनी अख्खं गाव, किनाऱ्याचा कानाकोपरा तपासला होता. पण, कुणीच सापडलं नव्हतं. त्यामुळे संशयितांबद्दल आणखी माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी त्या विद्यार्थिनीला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावलं. तेव्हा, आपण हे सगळं थ्रील अनुभवण्यासाठी केलं होतं, असा खुलासा तिनं केला. तो ऐकून पोलिसांना काय करावं, हेच कळेनासं झालं.
काही दिवसांपूर्वी या मुलीनं ISच्या दहशतवाद्यांचे फोटो पाहिले होते. काळ्या कपड्यांतील त्या दहशतवाद्यांकडे ऑटोमॅटिक रायफल्स होत्या. त्यातूनच तिची विचारचक्र फिरली होती आणि ही अशी माणसं आपण उरणमध्ये पाहिल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं होतं. तिच्या या म्हणण्याला आणखीही काही विद्यार्थ्यांनी दुजोरा दिल्यानं सुरक्षा यंत्रणांनी 'मिशन उरण' हाती घेतलं होतं. आता, या विद्यार्थ्यांनी नेमकं कुणाला पाहिलं, की तेही कपोलकल्पित गोष्ट सांगत होते, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, कुठल्याही अॅलर्टकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. हे दुर्लक्ष महागात पडू शकतं. दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी जनतेची सावधगिरी हे महत्त्वाचं अस्त्र आहे. हे ओळखून नागरिकांनी अफवा किंवा चुकीची माहिती पसरवू नये, असं आवाहन सुरक्षा अधिकाऱ्यानं केलं आहे.