दिल्ली:
मंगळवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये गुरुवार रात्रीपासून प्रचारबंदी लागू केली आहे. या निर्णयावर बसपा अध्यक्षा मायावती आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं पाठोपाठ आता काँग्रेसनेही हरकत घेतली आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक संहितेच्या कलम १४ आणि २१चेउल्लंघन केलं असून १६ मे हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस ठरला आहे अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
कोलकाता येथे भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी प्रचंड हिंसाचार केला. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आचार संहितेच्या एक दिवस आधीच गुरुवार रात्रीपासून प्रचारबंदीचा लागू करण्याचे निर्देश दिले. पण गुरुवारी मोदी यांची लक्ष्मीकांतपूर आणि दमदम येथे सभा असल्यामुळे गुरुवार सकाळऐवजी रात्रीपासून प्रचारबंदी करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची टीका केली जात आहे. ममता आणि मायावतींनी याप्रकरणी टीका केल्यानंतर आता काँग्रेसनेही निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
' निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम ३२४चा गैरवापर केला आहे. कोणत्याही स्वतंत्र लोकशाहीत अशाप्रकारचा पक्षपातीपणा करणे स्वीकारार्ह नाही. हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. ' असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज सकाळी दिल्लीत पत्रकार परिषदेत केला आहे. ' निवडणूक आयोगाने निवडणूक संहितेच्या कलम १४ आणि २१चेउल्लंघन केलं आहे. तसंच सर्वांना समान संधी देण्याचा संविधानिक अधिकारही काढून घेतला आहे. हे अन्याय्य आहे' अशी टीकाही त्यांनी केली आहे.
यावर्षी काँग्रेसने नरेंद्र मोदी आणि अमित शहांविरोधात आचार संहितेचा भंग केल्याच्या एकूण ११ तक्रारी दाखल केल्या होत्या. यामध्ये अमित शहा यांनी उमेदवारांना धमकावल्याच्या तक्रारींचाही समावेश होता. पण निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. सर्व प्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या या पक्षपातीपणाचा सुरजेवालांनी चांगलाच समाचार घेतला. 'निवडणूक आयोग संविधानाचा विश्वासघात करतो आहे. संविधानातील समान संधीच्या तत्त्वाचे उल्लंघन केलं जातं आहे'. असंही यावेळी त्यांनी सांगितलं. १९ मेला शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये ९ जागांवर मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मेला जाहीर करण्यात येणार आहेत.
मंगळवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये गुरुवार रात्रीपासून प्रचारबंदी लागू केली आहे. या निर्णयावर बसपा अध्यक्षा मायावती आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं पाठोपाठ आता काँग्रेसनेही हरकत घेतली आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक संहितेच्या कलम १४ आणि २१चेउल्लंघन केलं असून १६ मे हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस ठरला आहे अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
कोलकाता येथे भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी प्रचंड हिंसाचार केला. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आचार संहितेच्या एक दिवस आधीच गुरुवार रात्रीपासून प्रचारबंदीचा लागू करण्याचे निर्देश दिले. पण गुरुवारी मोदी यांची लक्ष्मीकांतपूर आणि दमदम येथे सभा असल्यामुळे गुरुवार सकाळऐवजी रात्रीपासून प्रचारबंदी करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची टीका केली जात आहे. ममता आणि मायावतींनी याप्रकरणी टीका केल्यानंतर आता काँग्रेसनेही निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
' निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम ३२४चा गैरवापर केला आहे. कोणत्याही स्वतंत्र लोकशाहीत अशाप्रकारचा पक्षपातीपणा करणे स्वीकारार्ह नाही. हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. ' असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज सकाळी दिल्लीत पत्रकार परिषदेत केला आहे. ' निवडणूक आयोगाने निवडणूक संहितेच्या कलम १४ आणि २१चेउल्लंघन केलं आहे. तसंच सर्वांना समान संधी देण्याचा संविधानिक अधिकारही काढून घेतला आहे. हे अन्याय्य आहे' अशी टीकाही त्यांनी केली आहे.
यावर्षी काँग्रेसने नरेंद्र मोदी आणि अमित शहांविरोधात आचार संहितेचा भंग केल्याच्या एकूण ११ तक्रारी दाखल केल्या होत्या. यामध्ये अमित शहा यांनी उमेदवारांना धमकावल्याच्या तक्रारींचाही समावेश होता. पण निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. सर्व प्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या या पक्षपातीपणाचा सुरजेवालांनी चांगलाच समाचार घेतला. 'निवडणूक आयोग संविधानाचा विश्वासघात करतो आहे. संविधानातील समान संधीच्या तत्त्वाचे उल्लंघन केलं जातं आहे'. असंही यावेळी त्यांनी सांगितलं. १९ मेला शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये ९ जागांवर मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मेला जाहीर करण्यात येणार आहेत.