अ‍ॅपशहर

महिनाभर गावात जागोजागी आगीच्या घटना, भूताच्या अफवेने लोक दहशतीत; अखेर गूढ उकललं अन्...

Crime News: गेल्या महिन्याभरापासून गावात ठिकठिकाणी आगीच्या घटना घडत होत्या. लोकांना कळत नव्हतं नेमकं काय होतंय. त्याच्यामागील काही कारणंही सापडत नव्हतं. त्यामुळे अख्खं गाव हे भूताच्या अफवेने दहशतीखाली होतं. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी या घटनेचा छडा लावला तेव्हा सारेच हैराण झाले.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2023, 9:28 am
तिरुपती: आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात एका १९ वर्षीय तरुणीने आईच्या वागणुकीला कंटाळून जवळपास महिनाभर गावातच वेगवेगळ्या ठिकाणी आग लावून अख्ख्या गावाला हैराण करुन सोडलं. सोमवारी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. आपल्याप्रती आईची वागणूक सुधारण्यासाठी आणि कुटुंबाला दुसऱ्या गावी जाण्यास भाग पाडण्यासाठी कीर्ती नावाच्या मुलीने ठिकठिकाणी जाळपोळ केली. नुकताच कीर्तीचा इंटरमिजिएटचा निकाल लागला, त्यात ती नापास झाली आहे. तेव्हापासून तिला गाव सोडून जायचे होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Fire


किर्तीने आधी तिच्या घराला आग लावली

कीर्तीचा असं वाटलं होतं की आगीच्या घटनांमुळे तिच्या कुटुंबातील सदस्य अंधश्रद्धेमुळे गाव सोडतील. त्यामुळे तिने आपल्या कुटुंबातील लोकांचे कपडे जाळण्यास सुरुवात केली. कपड्यांव्यतिरिक्त तिनी काही गवताच्या ढिगाऱ्यांनाही आग लावल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे काही रहिवाशांनी स्थानिक आमदार, पोलिस आणि सरकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यासोबतच गावाला कोणत्या कथित शापापासून मुक्त करण्यासाठी तसेच, देवांना शांत करण्यासाठी विधीही केले जात होते, अशी माहिती तिरुपती जिल्ह्याचे एएसपी जे वेंकट राव यांनी दिली.

जिथे कधी भांडी घासली, आज त्याच रेस्टॉरंटची मालकीण झाली; १८ वर्षीय तरुणीची थक्क करणारी कहाणी
अख्ख्या गावात दहशत

कीर्तीने स्वतःच्या घरात तीन वेळा कपडे जाळण्याव्यतिरिक्त शेजाऱ्यांच्या घरीही असेच केले. ती तिच्या आईवर इतकी नाराज होती की तिने झोपेत असताना तिची साडी देखील जाळली. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. गावकऱ्यांची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गावात पहारा देत दक्षता वाढवली. त्याचवेळी पोलिसांना कीर्तीवर संशय आल्याने तिची चौकशी करण्यात आली. यावेळी तिने गेल्या एक महिन्यापासून गावातील विविध ठिकाणी जाळपोळ केल्याची कबुली दिली.


पोलिसांनी किर्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला

तपासात पोलिसांना कळले की, कीर्तीने मित्र बोलत नसल्याच्या मूर्खपणाच्या कारणावरूनही जाळपोळ करण्यास सुरुवात केली होती. याशिवाय, पोलिसांनी जळालेले साहित्य फॉरेन्सिक सायन्सेस लॅबोरेटरीकडे (एफएसएल) पाठवले असून, त्या घटनांमध्ये कोणतेही केमिकल वापरण्यात आले नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पोलिसांनी किर्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. कीर्तीने आईकडून चोरलेले तीस हजार रुपयेही पोलिसांनी जप्त केले.
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख