अ‍ॅपशहर

मुलगा व्हावा म्हणून शेजारच्या मुलाचा दिला बळी

आपल्याला मूल व्हावं म्हणून शेजाऱ्याच्या मुलाचा बळी चढवण्याचा भयंकर प्रकार इंदूरमध्ये घडला आहे. मुलाच्या अभिलाषेपायी एका २ वर्षीय चिमुरड्याचा बळी देत त्याची क्रूर पद्धतीने हत्या करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शाळेच्या बस चालविणारा अंधश्रद्धाळू ड्रायव्हर आणि त्याच्या दोन पत्नींना अटक केली. मन हेलावणाऱ्या या प्रकरणात एका खासगी शाळेच्या बसचा ड्रायव्हर दिलीप बागरी (३६) आणि त्याच्या दोन पत्नी संतोषबाई (२८) आणि पुष्पा (३०) यांना अटक करण्यात आल्याची माहिती डीआयजी हरिनारायणचारी मिश्रा यांनी दिली आहे.

Maharashtra Times 17 Jul 2017, 7:40 pm
मटा ऑनलाइन वृत्त। इंदूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 year old killed by bus driver and hsi two wives in indore
मुलगा व्हावा म्हणून शेजारच्या मुलाचा दिला बळी


आपल्याला मूल व्हावं म्हणून शेजाऱ्याच्या मुलाचा बळी चढवण्याचा भयंकर प्रकार इंदूरमध्ये घडला आहे. मुलाच्या अभिलाषेपायी एका २ वर्षीय चिमुरड्याचा बळी देत त्याची क्रूर पद्धतीने हत्या करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शाळेच्या बस चालविणारा अंधश्रद्धाळू ड्रायव्हर आणि त्याच्या दोन पत्नींना अटक केली. मन हेलावणाऱ्या या प्रकरणात एका खासगी शाळेच्या बसचा ड्रायव्हर दिलीप बागरी (३६) आणि त्याच्या दोन पत्नी संतोषबाई (२८) आणि पुष्पा (३०) यांना अटक करण्यात आल्याची माहिती डीआयजी हरिनारायणचारी मिश्रा यांनी दिली आहे.

हे तिन्ही आरोपी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ४० किमीवर असलेल्या गढी बिल्लौद गावचे रहिवाशी आहेत. बागरी याने यापूर्वी सज्जनबाई नावाच्या महिलेशी देखील लग्न केले होते. १२ वर्षांपूर्वी प्रसूती होत असताना तिचा मृत्यू झाला. सज्जनबाईपासून बागरीला दोन मुली झाल्या. मात्र त्याला मुलगे हवे होते. त्यासाठी त्याने दोन लग्नं केली. मात्र या दोन्ही पत्नींपासून त्याला मूलबाळ झाले नाही.

९ जूनला बागरी आणि त्यांच्या दोन पत्नींनी एका तांत्रिकाच्या सल्ल्यानुसार आपल्या शेजाऱ्याचा २ वर्षांचा मुलगा यश याचे अपहरण केले. त्यांनी यशला आपल्या घरातच लपवून ठेवले. त्यानंतर या निरागस जीवाची हत्या केली असा बागरी आणि त्याच्या पत्नींवर आरोप आहे.

असे केले अत्याचार

डीआयजी मिश्रा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ९ जूनच्या रात्री बागरी आणि त्याच्या पत्नींनी कागदाला लावले जाणारे पीन निरागस यशच्या अंगावर टोचण्यात आले. भयंकर वेदना होत असल्यामुळे यश रडू लागला. मात्र या तिघांनी त्याच्या तोंडात बोळे कोंबले. श्वास कोंडल्याने यशचा त्याचवेळी मृत्यू झाला. मात्र त्याच्या शरीराशी तब्बल तीन तास अमानुष अत्याचार करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात या सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या असल्याचेही मिश्रा म्हणाले.

पोलिस या प्रकरणाची विस्तृत तपासणी करत आहेत. अघोरी कृत्य करण्याचा सल्ला देणाऱ्या तांत्रिकाचाही पोलिस शोध घेत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज