अ‍ॅपशहर

विजेच्या खांबाला ट्रकची धडक; २० ठार

आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात एका भरधाव ट्रकने विजेच्या खांबाला धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात २० जण ठार तर १० जण जखमी झाले आहेत. मृतांमधील बहुतांश जणांचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra Times 21 Apr 2017, 6:34 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अमरावती (आंध्र प्रदेश)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 dead after truck ploughs through roadside shops in andhra pradesh
विजेच्या खांबाला ट्रकची धडक; २० ठार


आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात एका भरधाव ट्रकने विजेच्या खांबाला धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात २० जण ठार तर १० जण जखमी झाले आहेत. मृतांमधील बहुतांश जणांचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

चित्तूरमधील येर्पेडू गावात ही भीषण घटना घडली. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि सर्वात आधी एका कारला धडक बसली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने उद्ध्वस्त करत हा ट्रक एका विजेच्या खांबाला जाऊन धडकला. या अपघातातील रुग्णांना तिरुपती आणि श्रीकालहस्ती येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. विजेचा तारांचा करंट लागल्याने मृतांचा आकडा वाढल्याचे शहर पोलीस अधीक्षक विजयलक्ष्मींनी सांगितले. जखमींमध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

या घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई राज्य सरकारने जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. मृतांच्या वारसांचं सांत्वन करताना जखमींना लवकरात लवकर आराम पडो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज