अ‍ॅपशहर

'मारुती सुझुकी' हिंसाचारप्रकरणी १३ आरोपींना जन्मठेप!

२०१२ मधील मारुती सुझुकी मानेसर प्लांटमध्ये घडलेल्या हिंसाचार प्रकरणाचा हरियाणा येथील गुरुग्राम न्यायालयाने १० मार्चला निकाल दिला. या प्रकरणात १३ आरोपींना जन्मठेप तर इतर ४ आरोपींना ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रकरणातील इतर १४ आरोपींना ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Maharashtra Times 18 Mar 2017, 8:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त। गुरुग्राम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2012 maruti factory violence case haryana court imprisons 13 for life 5 year jail term for 4
'मारुती सुझुकी' हिंसाचारप्रकरणी १३ आरोपींना जन्मठेप!


२०१२ मधील मारुती सुझुकी मानेसर प्लांटमध्ये घडलेल्या हिंसाचार प्रकरणाचा हरियाणा येथील गुरुग्राम न्यायालयाने १० मार्चला निकाल दिला. या प्रकरणात १३ आरोपींना जन्मठेप तर इतर ४ आरोपींना ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रकरणातील इतर १४ आरोपींना ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून या आरोपींनी ३ वर्षांचा तुरुंगवास भोगून आपली शिक्षा पूर्ण केलेली आहे.

काय होते मारुती सुझुकी मानेसर प्लांटमधील हिंसाचारप्रकरण...
१८ जुलै २०१२ मध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या मानेसर प्लांटमध्ये पुकारण्यात आलेल्या संपादरम्यान झालेल्या हिंसेमध्ये व्यवस्थापन विभागातील ९८ लोक जखमी झाले होते. तर कंपनीचे महाव्यवस्थापक अवनीश देव यांचा जिवंत जळाल्याने मृत्यू झाला होता. प्लांटचा मोठा भाग जळून खाक झाला होता. तसेच इतर परिसरातही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर प्लांटच्या ५२५ कामगारांनी आपली नोकरीही गमावली होती. या प्रकरणात एकूण १४८ जणांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र त्यातील ९० जणांची नावे एफआयआरमध्ये नव्हती. जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना ३१ आरोपींना शिक्षा सुनावली तर इतर ११७ जणांची आरोपातून मुक्तता करण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज