IPL चा शंखनाद! नवा लोगो आला; बीसीसीआयनं विचारला 'हा' प्रश्न
नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा IPL येत्या १९ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. करोना व्हायरसमुळे मार्च महिन्यात होणारी ही स्पर्धा आता होत आहे. करोना, विवोचे प्रायोजकत्व मागे घेणे आदी अडथळे पार करत अखेर आता आयपीएलला सुरुवात होत आहे.
भिवंडीत थरार; उद्योजकावर नातेवाइकांनीच केला गोळीबार
ठाणे: गावाकडील घर आणि शेतजमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून उद्योजकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री भिवंडीतील गुलजारनगरमध्ये घडली. गोळीबारात जखमी झालेल्या या व्यक्तीला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी दोन आरोपींना तात्काळ अटक केली आहे.
स्वदेशी करोना लशीवर गुडन्यूज; आरोग्यमंत्र्यांनी सांगितले कधी मिळेल!
नवी दिल्ली: देशात तयार झालेल्या लशींची चाचणी (Corona Vaccine Trial) सध्या सुरू असून या वर्षीच्या शेवटपर्यंत भारतात लस उपलब्ध होऊ शकते. हा दावा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी केला आहे. भारत बायोटेकने बनवलेली Covaxin ही करोनावरील स्वदेशी लस या वर्षाच्या शेवटी उपलब्ध होईल असे एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट सांगितले आहे. सन २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ही लस वापरासाठी तयार असेल असेही डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
सोने आणखी स्वस्त; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
मुंबई : कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमधील घसरण शुक्रवारी देखील सुरूच आहे. सध्या सोने ३५१ रुपयांनी स्वस्त झाले असून त्याचा भाव प्रती १० ग्रॅमला ५१८०० रुपये झाला आहे. चांदीमध्ये मात्र किंचित वाढ झाली आहे.
'ते' चॅट उघड झाल्यानंतर रिया आणि महेश भट्ट पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात अनेक घडामोडी होत आहेत. ८ जून रोजी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही त्याच्या घरातून निघून गेली होती. सुशांतनंच रियाला घरातून निघून जाण्यासाठी सांगितल्याचं तिनं पोलिसा जबाबात म्हटलं आहे. रियानं जेव्हा सुशांतचं घर सोडलं,त्यानंतर तिनं बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांना मेसेज करून यासंदर्भात सांगितलं होतं.
नगर हादरले; तुफान हाणामारीत ३ सख्ख्या भावांसह चौघांचा निर्घृण खून
नगर: गांजा ओढण्यासाठी एकत्र आलेल्या आदिवासी तरुणांमध्ये तुफान हाणामारीत तीन सख्या भावांसह चौघांचा खून झाला. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथे ही घटना घडली. घटनेनंतर तिघांचे मृतदेह नातेवाइक तरुणानेच दुचाकीवरून घरी नेले.
शेअर बाजार; सेन्सेक्स-निफ्टी आज घसरणीतून सावरणार
मुंबई : गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीने बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. निफ्टीने गुरुवारी ९६.२० अंकांची घसरण घेत ११,४०० च्या पातळीखाली ११,३१२.२० अंकांवर विश्रांती घेतली. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सनेदेखील ३९४.४० अंकांची घसरण घेत ३८,२२०.३९ अंकांवर बंद झाला.
दाभोलकर प्रकरण: प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य
मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला सात वर्षे झाल्याच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात खळबळजनक वक्तव्य केलं आहे. 'सध्या महाराष्ट्रात असलेल्या सरकारमधील एका मोठ्या व्यक्तीनंच दाभोलकर प्रकरण दाबलं आहे,' असा संशय आंबेडकरांनी व्यक्त केला आहे. आंबेडकरांचा नेमका रोख कुणाकडे आहे, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
करोना लस: रशिया नरमला; ४० हजारजणांवर होणार लस चाचणी
मॉस्को: रशियाने करोनाच्या संसर्गाला अटकाव करणारी लस विकसित केली असल्याची घोषणा केली होती. आता रशियाने पुढील आठवड्यात या लशीची चाचणी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. तब्बल ४० हजारजणांना ही लस देण्यात येणार आहे. एका परदेशी संशोधन संस्थेच्या देखरेखीत ही चाचणी होणार आहे. रशियाने लस सापडली असल्याचा दावा केल्यानंतर अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी त्यावर शंका उपस्थित केल्या होत्या.
काँग्रेसचे कोल्हापूरचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांना करोना
मुंबई: राज्यातील राजकीय नेते व लोकप्रतिनिधींना करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले असून आता कोल्हापूर दक्षिणचे काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांना करोनानं गाठलं आहे.
करोनाची कॉलर ट्यून ताबडतोब बंद करा; मनसेचा नेता संतापला
मुंबई: भारतात करोनाचा शिरकाव झाल्यापासून गेले पाच महिने प्रत्येक मोबाइलवर ऐकू येणाऱ्या करोनाच्या कॉलर ट्यूनला लोक अक्षरश: वैतागले आहेत. राजकीय नेतेही याला अपवाद नाहीत. प्रकाश आंबेडकरांनंतर आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही या कॉलर ट्यूनला आक्षेप घेतला असून ती ताबडतोब बंद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
'शिवरायांच्या महाराष्ट्राला नेहमीच हा दुजाभाव सहन करावा लागला'
मुंबई: 'प्रत्येक राज्याने भूमिपुत्रांचा विचार करावा. त्यांना रोजगारात प्राधान्य मिळावे हे घटनेनुसारच आहे, पण त्या घटनेनुसार महाराष्ट्राने भूमिपुत्रांचा विचार केल्यावर देशाला राष्ट्रीय एकात्मतेची उचकी लागते. मध्य प्रदेशने त्याच राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला असताना सगळे चिडीचूप कसे आहेत? हा दुजाभाव शिवरायांच्या महाराष्ट्राला नेहमीच सहन करावा लागला,' अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे.
‘पीएम केअर’ला छाननीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पी चिदंबरम यांचा आरोप
नवी दिल्ली: करोना साथीचा मुकाबला करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'पीएम केअर फंडा'वर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना, हा निधी कोणत्याही प्रकारच्या छाननीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे, असा गंभीर आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी गुरुवारी ट्वीटच्या माध्यमातून केला.
पार्थ पवारांविषयी प्रश्न विचारताच सुप्रिया सुळेंनी हात जोडले!
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनहिताच्या कामांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुरुवारी मंत्रालयात भेट घेतली. या भेटीनंतर पार्थ पवार यांच्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी हात जोडले. तसेच, कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.