मटा ऑनलाइन वृत्त । सुकमा
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले आहेत. हे सर्व जवान सीआरपीएफच्या ७४ बटालियनचे होते. दरम्यान, नक्षलवादी आणि जवानांमध्ये जोरदार चकमक सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सुकमातील नक्षलग्रस्त दक्षिण बस्तरमध्ये चिंतागुफाजवळच्या बुर्कापाल गावात आज दुपारी १२.२५ च्या सुमरास नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्तीपथकावर हल्ला चढवला. नक्षलवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २५ जवान शहीद झाले तर आणखी ६ जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टर रवाना झाले आहे, असे सुकमाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जीतेंद्र शुक्ला यांनी सांगितले.
सुकमा जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या १२ जवानांना वीरमरण आलं होतं. त्यानंतर आता याच जिल्ह्यात पुन्हा नक्षलवाद्यांनी थैमान घातल्याने राज्य सरकार हादरलं असून छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, दंतेवाडा जिल्ह्यातही आज मोठा अनर्थ टळला. नक्षलवाद्यांनी पेरलेली १० किलो आयईडी स्फोटके वेळीच निकामी करण्यात आल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
We are proud of the valour of our @crpfindia personnel. The sacrifice of the martyrs will not go in vain. Condolences to their families. — Narendra Modi (@narendramodi) April 24, 2017
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले आहेत. हे सर्व जवान सीआरपीएफच्या ७४ बटालियनचे होते. दरम्यान, नक्षलवादी आणि जवानांमध्ये जोरदार चकमक सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सुकमातील नक्षलग्रस्त दक्षिण बस्तरमध्ये चिंतागुफाजवळच्या बुर्कापाल गावात आज दुपारी १२.२५ च्या सुमरास नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्तीपथकावर हल्ला चढवला. नक्षलवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २५ जवान शहीद झाले तर आणखी ६ जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टर रवाना झाले आहे, असे सुकमाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जीतेंद्र शुक्ला यांनी सांगितले.
सुकमा जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या १२ जवानांना वीरमरण आलं होतं. त्यानंतर आता याच जिल्ह्यात पुन्हा नक्षलवाद्यांनी थैमान घातल्याने राज्य सरकार हादरलं असून छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, दंतेवाडा जिल्ह्यातही आज मोठा अनर्थ टळला. नक्षलवाद्यांनी पेरलेली १० किलो आयईडी स्फोटके वेळीच निकामी करण्यात आल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
We are proud of the valour of our @crpfindia personnel. The sacrifice of the martyrs will not go in vain. Condolences to their families. — Narendra Modi (@narendramodi) April 24, 2017