अ‍ॅपशहर

26/11 पाकिस्तानला बेफिकिरीबाबत भारताने सुनावले

'२६/११ च्या हल्ल्यात १६६ जणांनी आपले प्राण गमावले, ते आजही न्यायाची वाट पाहत आहेत आणि या हल्ल्याचा कट रचणारे पाकिस्तानच्या रस्त्यावर मोकाट फिरत आहेत,' असे भारताने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या या निवेदनात पाकिस्तानवर टीका करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2018, 5:19 pm
नवी दिल्ली :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26-11-attack


दहा वर्षांनंतरही मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील बळींना न्याय मिळालेला नाही. हल्ल्याचा कट रचणारे आजही पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत. त्यांच्याविरोधात कारवाईबाबत बेफिकिरी दाखवणाऱ्या पाकिस्तानला भारताने खडे बोल सुनावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात पाकिस्तानवर टीका करण्यात आली आहे.

'२६/११ च्या हल्ल्यात १६६ जणांनी आपले प्राण गमावले, ते आजही न्यायाची वाट पाहत आहेत आणि या हल्ल्याचा कट रचणारे पाकिस्तानच्या रस्त्यावर मोकाट फिरत आहेत,' असे या निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी २६/११ च्या हल्ल्यासाठी पाकिस्तानमधून आल्याचे मान्यही केले होते, याकडेही सरकारने लक्ष वेधले. 'आम्ही पुन्हा एकवार पाकिस्तान सरकारला सांगतो की दुटप्पीपणा सोडून द्या आणि या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना शिक्षा देऊन बळींना न्याय द्या,' असं आवाहन या निवेदनात केलं आहे.

या हल्ल्यातील दोषींविरोधात कठोर कारवाई करा, असा इशारा अमेरिकेनं पाकिस्तानला दिला आहे. अमेरिकेच्या या कृतीचेही भारताने स्वागत केले आहे.



महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज