अ‍ॅपशहर

अम्माच्या निधनाचा धक्का; २८० लोकांचा मृत्यू?

अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता ऊर्फ अम्मा यांच्या निधनाच्या धक्क्यानं राज्यात २८० लोकांचा मृत्यू झाला आहे, असा दावा अण्णा द्रमुकनं केला आहे. पक्षानं आज या मृतांच्या नावांची यादीच जाहीर केली.

Maharashtra Times 10 Dec 2016, 2:42 pm
मटा ऑनलाइन वृत्त । चेन्नई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 280 died of shock over jayas demise aiadmk
अम्माच्या निधनाचा धक्का; २८० लोकांचा मृत्यू?


अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता ऊर्फ अम्मा यांच्या निधनाच्या धक्क्यानं राज्यात २८० लोकांचा मृत्यू झाला आहे, असा दावा अण्णा द्रमुकनं केला आहे. पक्षानं आज या मृतांच्या नावांची यादीच जाहीर केली.

तामिळनाडूची सत्ता सलग दोनवेळा खेचून आणणाऱ्या जयललिता या तामिळनाडूत प्रचंड लोकप्रिय होत्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांना 'आई'चे स्थान होते. गरिबांसाठी माफक दरांत सुरू केलेल्या अनेक योजनांमुळं त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. दोन महिन्यांहून अधिक काळ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जयललिता पुन्हा बऱ्या होऊन येतील, अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना होती. त्यासाठी ते डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत होते. मात्र, उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळं ४ डिसेंबर रोजी रात्री त्यांचं निधन झालं. या निधनाचा अनेकांना धक्का बसला. त्या धक्क्यानं अनेकांचा मृत्यू झाल्याचं अण्णा द्रमुकचं म्हणणं आहे. अशा २८० लोकांची यादीच पक्षानं जाहीर केली आहे. त्यात चेन्नईसह वेल्लोर, थिरुवल्लरी, थिरुवन्नामलई, कुडलकोर, कृष्णगिरी, इरोड आणि त्रिपूर येथील लोकांचा समावेश आहे.

अण्णा द्रमुकनं या २८० लोकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं असून त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज