श्रीनगर: पाकिस्तानने आज नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर सुरक्षा दलाचे जवान आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत पाकचे तीन सैनिक ठार झाले. पाकिस्तानी सैन्यानेही या वृत्तास दुजोरा दिला आहे.
रावलकोट सेक्टरजवळ एलओसीवर पाकिस्तानच्या तुकडीने जोरदार गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जवानांनीही गोळीबार केल्याने त्यात पाकिस्तानचे तीन सैनिक मारल्या गेले. दरम्यान, पाकिस्तानकडून तीनच सैनिक ठार झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी या चकमकीत पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालं आहे, असं भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे. या गोळीबारात सहा घरांचं नुकसान झालं असून काही स्थानिक जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेवर मोर्टार डागले होते. त्यात साजिदा बी नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला तर पाचजण जखमी झाले होते.
रावलकोट सेक्टरजवळ एलओसीवर पाकिस्तानच्या तुकडीने जोरदार गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जवानांनीही गोळीबार केल्याने त्यात पाकिस्तानचे तीन सैनिक मारल्या गेले. दरम्यान, पाकिस्तानकडून तीनच सैनिक ठार झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी या चकमकीत पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालं आहे, असं भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे. या गोळीबारात सहा घरांचं नुकसान झालं असून काही स्थानिक जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेवर मोर्टार डागले होते. त्यात साजिदा बी नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला तर पाचजण जखमी झाले होते.