अ‍ॅपशहर

तीन वर्षात ८० हजार भारतीयांची सुटका: सुषमा स्वराज

केंद्र सरकाराच्या या तीन वर्षाच्या कार्यकाळात परदेशात वेगवेगळ्या अडचणीत सापडलेल्या सुमारे ८० हजारापेक्षाही अधिक भारतीयांची सुटका करून मायदेशी आणण्यात यश आले असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हंटले.

Maharashtra Times 5 Jun 2017, 4:53 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 years of modi govt 80000 indians stranded abroad have been rescued sushma says
तीन वर्षात ८० हजार भारतीयांची सुटका: सुषमा स्वराज


केंद्र सरकाराच्या या तीन वर्षाच्या कार्यकाळात परदेशात वेगवेगळ्या अडचणीत सापडलेल्या सुमारे ८० हजारापेक्षाही अधिक भारतीयांची सुटका करून मायदेशी आणण्यात यश आले असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हंटले. केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला.


यावेळी सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह आणि एम.जे. अकबर या आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या परदेश दौऱ्यांमुळे इतर देशांसोबत भारताचे संबंध चांगले झाले असल्याचा त्यांनी दावा केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस करारातून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतरदेखील भारत-अमेरिका संबंधावर परिणाम झाला नसल्याचे स्वराज यांनी नमूद केले. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक चांगले होत असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्यांच्याबद्दल समझोता करण्यात येणार नसल्याचेही सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. एनएसजीच्या सदस्यत्वाबाबत चीनसोबत भारताची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. पासपोर्टसाठीच्या नियमांमध्ये बदल केल्यामुळे पासपोर्ट अर्जात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, थेट परदेशी गुंतवणुकीत ३७.५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज