अ‍ॅपशहर

ऑक्स‌िजनअभावी ३० मुलांचा मृत्यू

ऑक्स‌िजनचा पुरवठा बंद झाल्याने ४८ तासांत ३० मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गोखपूरमधील बाबा राघवदास मेड‌किल कॉलेजमध्ये घडली आहे. ही सर्व मुले मेंदूच्या ज्वरावर उपचार घेण्यासाठी या रुग्णालयात दाखल झाली होती. जिल्हा दंडाध‌िकारी राजीव रौतेला यांनी या वृत्ताला दुजोरा द‌िला आहे.

Maharashtra Times 12 Aug 2017, 2:50 am
वृत्तसंस्था, गोरखपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 children death due to not supplying oxygen
ऑक्स‌िजनअभावी ३० मुलांचा मृत्यू


ऑक्स‌िजनचा पुरवठा बंद झाल्याने ४८ तासांत ३० मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गोखपूरमधील बाबा राघवदास मेड‌किल कॉलेजमध्ये घडली आहे. ही सर्व मुले मेंदूच्या ज्वरावर उपचार घेण्यासाठी या रुग्णालयात दाखल झाली होती. जिल्हा दंडाध‌िकारी राजीव रौतेला यांनी या वृत्ताला दुजोरा द‌िला आहे.

म‌िळालेल्या माहितीनुसार १३ मुले एनएनयू वॉर्डमध्ये दाखल होती, तर १७ मुले मेंदूज्वर वॉर्डमध्ये दाखल होती. ६९ लाख रुपयांचे बिल थकल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने गुरुवारी रात्रीपासूनच ऑक्सिजन पुरवठा बंद केला होता. तसेच सिलिंडरही संपले होते त्यामुळे मागील ४८ तासांमध्ये लहान मुलांना आपला जीव गमावावा लागला आहे.

बाबा राघवदास मेड‌किल कॉलेज हे गोरखपूरमधून सर्वांत मोठे रुग्णालय असून हा मुख्यमंत्री योगी आद‌त्यिनाथ यांचा पूर्वीचा लोकसभा मतदारसंघ आहे. आदित्यनाथ यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला डासांमुळे होणाऱ्या मेंदूज्वराविरोधात मोहीम हाती घेतली होती. या रोगामुळे दरवर्षी उत्तर प्रदेशात शेकडो मुलांचा मृत्यू होतो. या रोगाबाबत जनजागृती करण्यावरही आद‌ित्यनाथ यांनी भर द‌िला होता.

दरम्यान, बाबा राघवदास मेड‌किल कॉलेजमध्ये दोन वर्षांपूर्वीच लिक्विड ऑक्सिजन प्लान्ट बसवण्यात आले होते. त्याद्वारे मेंदूज्वर वॉर्डसह शेकडो रुग्णांना नळीद्वारे ऑक्सिजन पुरवला जात होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज