नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा नववा दिवस आहे. संपूर्ण देशात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून आलीय. गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३२८ नवे रुग्ण आढळले असून २९ राज्यांमध्ये एकूण रुग्णांची संख्या १९६५ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ५० रुग्णांचा मृत्यू झाला. यातील गेल्या २४ तासांमध्ये करोनाच्या एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सकारात्मक गोष्ट म्हणजे १५१ लोक बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलीय.
करोनाविरुद्ध एकजुटीने लढाई करू या: पंतप्रधान मोदी
'मरकझ'मधील ४०० जण करोना संक्रमित
दिल्लीतील निझामुद्दीन येथे मरकझला गेलेल्या ९ हजार लोकांची ओळख पटली आहे. या ९००० पैंकी १३०६ लोक परदेशी नागरिक आणि उरलेले इतर भारतीय आहेत. यातील जवळपास ४०० जण करोना संक्रमित असल्याचं समोर आलंय. तबलीघी जमातशी निगडीत १८०४ जणांना क्वारंटाईन करण्यात आलंय, अशीही माहिती केंद्रीय मंत्रालयानं दिलीय.
करोनाचा उद्रेक; तामिळनाडूत एकाच दिवसात ११० रुग्ण
धारावीमध्ये एकाचा मृत्यू
मुंबईतील धारावी भागात एकाचा मृत्यू झाल्यानंतर या भागातील ३०० घरं सील करण्यात आली आहेत, अशी माहितीही यावेळी लव अग्रवाल यांनी दिली
लॉकडाऊन गरजेचे, मात्र अंमलबजावणीची पद्धत चूक- सोनिया गांधी
'सर्वांच्या सहकार्याची गरज'
करोनाविरुद्ध लढा अजूनही सुरूच आहे. यामध्ये सर्वांच्या सहयोगाची आवश्यकता आहे. सर्व धर्माच्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं आहे. राज्य सरकारनंही लॉकडाऊनचं पालन सक्तीनं करण्याची गरज आहे, असंही आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं.
देशभरात करोनाचे एकूण बळी ५०, २४ तासांत १२ मृत्यू
करोनाविरुद्ध एकजुटीने लढाई करू या: पंतप्रधान मोदी
'मरकझ'मधील ४०० जण करोना संक्रमित
दिल्लीतील निझामुद्दीन येथे मरकझला गेलेल्या ९ हजार लोकांची ओळख पटली आहे. या ९००० पैंकी १३०६ लोक परदेशी नागरिक आणि उरलेले इतर भारतीय आहेत. यातील जवळपास ४०० जण करोना संक्रमित असल्याचं समोर आलंय. तबलीघी जमातशी निगडीत १८०४ जणांना क्वारंटाईन करण्यात आलंय, अशीही माहिती केंद्रीय मंत्रालयानं दिलीय.
करोनाचा उद्रेक; तामिळनाडूत एकाच दिवसात ११० रुग्ण
धारावीमध्ये एकाचा मृत्यू
मुंबईतील धारावी भागात एकाचा मृत्यू झाल्यानंतर या भागातील ३०० घरं सील करण्यात आली आहेत, अशी माहितीही यावेळी लव अग्रवाल यांनी दिली
लॉकडाऊन गरजेचे, मात्र अंमलबजावणीची पद्धत चूक- सोनिया गांधी
'सर्वांच्या सहकार्याची गरज'
करोनाविरुद्ध लढा अजूनही सुरूच आहे. यामध्ये सर्वांच्या सहयोगाची आवश्यकता आहे. सर्व धर्माच्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं आहे. राज्य सरकारनंही लॉकडाऊनचं पालन सक्तीनं करण्याची गरज आहे, असंही आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं.
देशभरात करोनाचे एकूण बळी ५०, २४ तासांत १२ मृत्यू