अमरावती (आंध्र प्रदेश) : 'वंदे भारत' मोहिमेंतर्गत आंध्र प्रदेशमध्ये विदेशांत अडकलेले ४५९ भारतीय मायदेशी परतले आहेत. लंडन, अबुधाबी आणि मनिला (फिलिपाइन्स) येथून आलेल्या विमांनांद्वारे ते मंगळवारी रात्री आणि बुधवारी भारतात परतले, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.विजयवाडा येथे बुधवारी लंडनहून आलेल्या 'एअर इंडिया'च्या विमानाद्वारे १४५ भारतीय मायदेशी परतले. तर, विशाखापट्टणम येथे मनिला (फिलिपिन्स) आणि अबुधाबी येथून मंगळवारी रात्री आलेल्या विमानांद्वारे अनुक्रमे १६६ आणि १४८ भारतीय प्रवासी आले आहेत. एकूण ४५९ भारतीय दोन दिवसांत त्यांच्या घरी परतले आहेत. सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
विदेशांतील ४५९ भारतीय परतले
'वंदे भारत' मोहिमेंतर्गत आंध्र प्रदेशमध्ये विदेशांत अडकलेले ४५९ भारतीय मायदेशी परतले आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2020, 4:00 am