अ‍ॅपशहर

पूरग्रस्त आसामसह ईशान्येत भूकंपाचे धक्के

आसामवर आधीच पुराचे संकट कोसळलेले असताना आसाम आणि अरुणाचल प्रदेशसह ईशान्येकडील राज्यांना आज भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर ५.६ इतकी या भूकंपाची तीव्रता होती. अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. दरम्यान, भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jul 2019, 4:16 pm
गुवाहाटी :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Earthquake


आसामवर आधीच पुराचे संकट कोसळलेले असताना आसाम आणि अरुणाचल प्रदेशसह ईशान्येकडील राज्यांना आज भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर ५.६ इतकी या भूकंपाची तीव्रता होती. अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. दरम्यान, भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

आसाममधील २९ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. पुरामुळे आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ५४ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे. राज्यात आधीच पुरामुळे हाहाकार माजलेला असताना आज भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिक आणखीच भयभीत झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजून ५२ मिनिटांनी आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड आणि अन्य भागांना भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज