अ‍ॅपशहर

महाराष्ट्रातील आणखी ३ जवानांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडातील मच्छिल सेक्टरमध्ये शनिवारी हिमस्खलनाच्या तडाख्यातून पाच जवानांना वाचवण्यात आले होते मात्र आज या पाचही जवानांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. यातील तीन जवान महाराष्ट्रातील आहेत.

Maharashtra Times 30 Jan 2017, 8:56 pm
मटा ऑनलाइन वृत्त । श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 soldiers rescued from avalanche 2 days ago die
महाराष्ट्रातील आणखी ३ जवानांचा मृत्यू


जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडातील मच्छिल सेक्टरमध्ये शनिवारी हिमस्खलनाच्या तडाख्यातून पाच जवानांना वाचवण्यात आले होते मात्र आज या पाचही जवानांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. यातील तीन जवान महाराष्ट्रातील आहेत.

सातारा-वाई येथील गणेश किसन ढवळे (३०), सांगली-कवठे महांकाळचे रामचंद्र श्यामराव माने (३४) आणि परभणीतील बालाजी भगवानराव अंबोरे (२६) हे महाराष्ट्रातील तीन जवान तसेच तामिळनाडूच्या मदुराईतील थामोथारा कन्नन (२७) आणि गुजरात-भावनगर येथील देवा हाझा भाई परमार (२७) अशी या पाच जवानांची नावे आहेत.

हवामान प्रतिकूल असतानाही आज या पाचही जवानांना तातडीचे आणि योग्य उपचार मिळावेत म्हणून मच्छिल येथून श्रीनगर येथे हलवण्यात आले मात्र दुर्दैवाने त्यांना आम्ही वाचवू शकलो नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, काश्मीर खोऱ्यात हिमस्खलनाच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत एका मेजरसह १९ जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, आज ज्या पाच जवानांचा मृत्यू झाला आहे त्या सर्वांचे पार्थिव मंगळवारी त्यांच्या मूळगावी पाठवण्यात येणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज