नवी दिल्ली: टाटा सन्सचे माजी संचालक आणि ख्यातनाम उद्योगपती सायरस मिस्त्रींचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. अहमदाबादहून मुंबईला येत असताना पालघरमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला. त्यामध्ये मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे मिस्त्री हे ५ स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या कारमधून प्रवास करत होते. त्यांच्या मर्सिडीज कारमध्ये सुरक्षेशी संबंधित अनेक सुविधा होत्या. मात्र तरीही मिस्त्री वाचू शकले नाहीत. या घटनेनंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी कार निर्मात्या कंपन्यांना सवाल उपस्थित केला.
कार निर्यात करायची असताना त्यात ६ एअरबॅग्स लावणाऱ्या कंपन्या तिच कार देशात विकायची असताना त्यात केवळ ४ एअरबॅग्ज लावतात. गरिबांचा जीव वाचवणं महत्त्वाचं नाही का? त्यांच्या जीवाला काहीच मोल नाही का? असे प्रश्न गडकरींनी उपस्थित केले आहेत. आंतरराष्ट्रीय जाहिरात संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गडकरींनी इंडिया टुडेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एअरबॅग्जवरून कंपन्यांना प्रश्न विचारला.
एअरबॅग्जची संख्या वाढवल्यावर इकॉनॉमी कारची किंमत वाढते, असा युक्तिवाद कंपन्यांकडून केला जातो. मात्र त्यामध्ये तथ्य नाही. एक एअरबॅग वाढवल्यानं कारची किंमत केवळ ९०० रुपयांनी वाढते, असं गडकरी म्हणाले. कारमध्ये सहा एअरबॅग्ज सक्तीच्या करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती गडकरींनी दिली.
अहमदाबाद-मुंबई हायवेचा वापर करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. दररोज असंख्य वाहनं हायवेवरून जातात. हा हायवे अतिशय धोकादायक असल्याचं गडकरींनी सांगितलं. सायरस मिस्त्रींचा ज्या हायवेवर अपघाती मृत्यू झाला, तो हायवे नितीन गडकरींनीच युती सरकारच्या काळात मंत्री असताना बांधला. त्यावेळी त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं होतं.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचं रस्त्याचं जाळं भारतात आहे. मात्र तरीही आपल्याला रस्ते सुरक्षेसाठी बरंच काम करणं गरजेचं आहे, असं गडकरी म्हणाले. 'दरवर्षी देशभरात ५ लाख अपघात होतात. त्यात दीड लाख जणांचा मृत्यू होतो. यापैकी ६५ टक्के जण १८ ते ३४ वयोगटातील असतात,' अशी आकडेवारी त्यांनी सांगितली.
कार निर्यात करायची असताना त्यात ६ एअरबॅग्स लावणाऱ्या कंपन्या तिच कार देशात विकायची असताना त्यात केवळ ४ एअरबॅग्ज लावतात. गरिबांचा जीव वाचवणं महत्त्वाचं नाही का? त्यांच्या जीवाला काहीच मोल नाही का? असे प्रश्न गडकरींनी उपस्थित केले आहेत. आंतरराष्ट्रीय जाहिरात संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गडकरींनी इंडिया टुडेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एअरबॅग्जवरून कंपन्यांना प्रश्न विचारला.
एअरबॅग्जची संख्या वाढवल्यावर इकॉनॉमी कारची किंमत वाढते, असा युक्तिवाद कंपन्यांकडून केला जातो. मात्र त्यामध्ये तथ्य नाही. एक एअरबॅग वाढवल्यानं कारची किंमत केवळ ९०० रुपयांनी वाढते, असं गडकरी म्हणाले. कारमध्ये सहा एअरबॅग्ज सक्तीच्या करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती गडकरींनी दिली.
अहमदाबाद-मुंबई हायवेचा वापर करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. दररोज असंख्य वाहनं हायवेवरून जातात. हा हायवे अतिशय धोकादायक असल्याचं गडकरींनी सांगितलं. सायरस मिस्त्रींचा ज्या हायवेवर अपघाती मृत्यू झाला, तो हायवे नितीन गडकरींनीच युती सरकारच्या काळात मंत्री असताना बांधला. त्यावेळी त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं होतं.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचं रस्त्याचं जाळं भारतात आहे. मात्र तरीही आपल्याला रस्ते सुरक्षेसाठी बरंच काम करणं गरजेचं आहे, असं गडकरी म्हणाले. 'दरवर्षी देशभरात ५ लाख अपघात होतात. त्यात दीड लाख जणांचा मृत्यू होतो. यापैकी ६५ टक्के जण १८ ते ३४ वयोगटातील असतात,' अशी आकडेवारी त्यांनी सांगितली.