मटा ऑनलाइन वृत्त । कानपूर
रात्री उशिरापर्यंत बँकेत काम करून घरी परतणारे एसबीआय बँकेचे ७ कर्मचारी अपघातात ठार झाले. गाडीच्या चालकाचाही अपघातात मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये हमीरपूर-सागर मार्गावर एका कंटेनरने कर्मचारी जात असलेल्या मारुती व्हॅनला जबरदस्त धडक दिली. यात एसबीआयचे ७ कर्मचारी आणि व्हॅनचालक असे ८ जण जागीच ठार झाले. दोन तासाच्या बचावकार्यानंतर क्रेनने कंटेनर हटवून व्हॅनमधील मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले. मारुती व्हॅन कंटेनरखाली चिरडली गेल्याने बचावकार्यात बराच वेळ लागला.
१००० आणि ५०० च्या नोट बंद केल्यानंतर एसबीआयच्या घाटमपूर शाखेतील हे सर्व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत बँकेत काम करत होते. काम संपवून सगळे रात्री एक वाजण्याच्या सुमारास परतीच्या दिशेने कानपूरला येत असतानाच बिनगवा गावाजवळ कंटेनर आणि व्हॅनमध्ये हा अपघात झाला. या अपघातात व्हॅन रस्त्यावरून फरफटत पाण्याने भरलेल्या लगतच्या खड्ड्यात पडली. त्यानंतर व्हॅनवर कंटेनरही आदळला. रात्री शुकशुकाट असल्याने लोकांचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी क्रेन बोलावून कंटेनर हटवेपर्यंत व्हॅनमधील प्रवासी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला होता.
शाखा व्यवस्थापक रुपेंद्र सिंह, अजय तिवारी, राहुल, नवीन श्रीवास्तव, उत्तम कुमार, सोहनलाल शुक्ला, अशोक तिवारी आणि चालक भरत लाल यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
रात्री उशिरापर्यंत बँकेत काम करून घरी परतणारे एसबीआय बँकेचे ७ कर्मचारी अपघातात ठार झाले. गाडीच्या चालकाचाही अपघातात मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये हमीरपूर-सागर मार्गावर एका कंटेनरने कर्मचारी जात असलेल्या मारुती व्हॅनला जबरदस्त धडक दिली. यात एसबीआयचे ७ कर्मचारी आणि व्हॅनचालक असे ८ जण जागीच ठार झाले. दोन तासाच्या बचावकार्यानंतर क्रेनने कंटेनर हटवून व्हॅनमधील मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले. मारुती व्हॅन कंटेनरखाली चिरडली गेल्याने बचावकार्यात बराच वेळ लागला.
१००० आणि ५०० च्या नोट बंद केल्यानंतर एसबीआयच्या घाटमपूर शाखेतील हे सर्व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत बँकेत काम करत होते. काम संपवून सगळे रात्री एक वाजण्याच्या सुमारास परतीच्या दिशेने कानपूरला येत असतानाच बिनगवा गावाजवळ कंटेनर आणि व्हॅनमध्ये हा अपघात झाला. या अपघातात व्हॅन रस्त्यावरून फरफटत पाण्याने भरलेल्या लगतच्या खड्ड्यात पडली. त्यानंतर व्हॅनवर कंटेनरही आदळला. रात्री शुकशुकाट असल्याने लोकांचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी क्रेन बोलावून कंटेनर हटवेपर्यंत व्हॅनमधील प्रवासी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला होता.
शाखा व्यवस्थापक रुपेंद्र सिंह, अजय तिवारी, राहुल, नवीन श्रीवास्तव, उत्तम कुमार, सोहनलाल शुक्ला, अशोक तिवारी आणि चालक भरत लाल यांचा मृतांमध्ये समावेश आहे.