मटा ऑनलाइन वृत्त । जौनपूर
जौनपूर- अलहाबाद मार्गावरील सिकरारा येथे आज दुपारी भीषण अपघात झाला. सई नदीवरील पुलावरून जाणारी बस सुमारे ३० फुट खोल खड्डयात कोसळल्याने ८ प्रवाशी जागीच ठार झाले. तर ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
सिव्हिल लाईन आगारातील एक बस अलाहाबादवरून जौनपूरला चालली होती. दुपारी दोनच्या सुमारास पुलावरून जाण्याआधीच बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि पुलाची रेलिंग तोडतच ही बस ३० फूट खोल खड्ड्यात कोसळली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांनी जोरजोरात आरडाओरडा करायला सुरूवात केली. प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरूवात केली. तर काही लोकांनी लगेचच पोलिसांना या भीषण अपघाताची माहिती देऊन त्यांना घटनास्थळी पाचारण केले.
या भीषण अपघातातील सर्वच्या सर्व ३५ जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रूग्ण आणि मृतांच्या नातेवाईकांनी रूग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी करून मातम सुरू केला आहे. त्यामुळे रूग्णालयाबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे . या घटनेची माहिती कळताच राजकारण्यांनीही रूग्णालयात धाव घेतली असल्याचं सुत्रांनी सांगितलं.
जौनपूर- अलहाबाद मार्गावरील सिकरारा येथे आज दुपारी भीषण अपघात झाला. सई नदीवरील पुलावरून जाणारी बस सुमारे ३० फुट खोल खड्डयात कोसळल्याने ८ प्रवाशी जागीच ठार झाले. तर ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
सिव्हिल लाईन आगारातील एक बस अलाहाबादवरून जौनपूरला चालली होती. दुपारी दोनच्या सुमारास पुलावरून जाण्याआधीच बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि पुलाची रेलिंग तोडतच ही बस ३० फूट खोल खड्ड्यात कोसळली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांनी जोरजोरात आरडाओरडा करायला सुरूवात केली. प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरूवात केली. तर काही लोकांनी लगेचच पोलिसांना या भीषण अपघाताची माहिती देऊन त्यांना घटनास्थळी पाचारण केले.
या भीषण अपघातातील सर्वच्या सर्व ३५ जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रूग्ण आणि मृतांच्या नातेवाईकांनी रूग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी करून मातम सुरू केला आहे. त्यामुळे रूग्णालयाबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे . या घटनेची माहिती कळताच राजकारण्यांनीही रूग्णालयात धाव घेतली असल्याचं सुत्रांनी सांगितलं.