कोट्टायम, केरळ : आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर केरळमधल्या एका ९३ वर्षीय वृद्धानं आणि त्याच्या ८८ वर्षीय पत्नीनं करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. ज्या वयात शरीरही साथ सोडून देतं अशा वयात या जोडप्यानं जीवघेण्या आजारावर मात करणं हे काही एका चमत्कारापेक्षा कमी नाही, असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सोमवारी या दोघांना 'कोट्टायम मेडिकल कॉलेज'मधून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी, या जोडप्याला निरोप देण्यासाठी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स आणि इतर हॉस्पीटल स्टाफही उपस्थित होता. डॉक्टरांनी टाळ्या वाजवून या वृद्ध जोडप्याच्या प्रेमाला आणि प्रखर इच्छाशक्तीला सलाम केला. या दरम्यान हे जोडपंही भावूक झालेलं दिसलं. यावेळी, कुणालाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.
'काबा बंद मग भारताच्या मशिदी का नाही?'
९३ वर्षीय थॉमस आणि ८८ वर्षांची त्यांची पत्नी मरियम्मा हे दोघेही कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. वयोमानानुसार हे दोघेही वेगवेगळ्या आजारांना लढा देत होते. उपचारा दरम्यान थॉमस यांना हृदयविकाराचा एक सौम्य झटकाही येऊन गेला. त्यांना श्वास घेणंही कठीण झालं होतं. दोघांनाही डायबेटीजसोबत हायपरटेन्शनचाही त्रास होता. त्यामुळे त्यांना वेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं.
उपचारा दरम्यान थॉमस आणि त्यांच्या पत्नीवर वेगवेगळ्या रुममध्ये उपचार सुरू होते. परंतु, त्यानंतर मात्र दोघांना ट्रान्सप्लान्ट आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. इथं ते एकमेकांना केवळ पाहू शकत होते.
दिल्ली हादरली; २०० जणांमध्ये करोनाची लक्षणं
नर्सही करोना पॉझिटिव्ह
दुसरीकडे, मरियम्मा यांनाही युरिनरी इन्फेक्शनसोबत बॅक्टेरियल इन्फेक्शनचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर जी नर्स या दोघांची काळजी घेत होती तीदेखील करोना पॉझिटिव्ह निघाली.
गेल्या आठवड्यांत उपचारानंतर या जोडप्याची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर रुग्णालयानं त्यांना ताबडतोब डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. अधिक काळ रुग्णालयात राहणं हेदेखील या जोडप्यासाठी धोकादायक होतं.
'महाराष्ट्रातून आले' सांगितल्यावर केली हत्या
मुलगा-सून इटलीमधून मायदेशात
या दाम्पत्याचा मुलगा आणि त्याचं कुटुंब २० फेब्रुवारी रोजी इटलीमधून मायदेशात परतलं होतं. त्यानंतर करोनाच्या भीतीनं हे संपूर्ण कुटुंब ५ मार्च रोजी करोना चाचणीसाठी रुग्णालयात दाखल झालं होतं. उल्लेखनीय म्हणजे या जोडप्यासहीत त्यांचा मुलगा, सून आणि आणखी दोन नातेवाईकांनाही डिस्चार्ज मिळाला.
डॉक्टर-नर्सेसच्या समर्पणाचं उदाहरण
इतके दिवस उपचारानंतर आणि डॉक्टरांनी घेतलेल्या काळजीमुळे त्यांना इथला लळा लागला होता. डॉक्टरांनीही अगदी आपल्या कुटुंबीयांप्रमाणे त्यांची काळजी घेतली. केरळचे अर्थ मंत्री थॉमस इसाक यांनी हे मेडिकल स्टाफच्या समर्पणाचं उत्तम उदाहरण असल्याचं म्हटलंय.
दिल्लीत येऊन गेलेल्या ६ जणांचा तेलंगणात करोनाने मृत्यू
'काबा बंद मग भारताच्या मशिदी का नाही?'
९३ वर्षीय थॉमस आणि ८८ वर्षांची त्यांची पत्नी मरियम्मा हे दोघेही कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. वयोमानानुसार हे दोघेही वेगवेगळ्या आजारांना लढा देत होते. उपचारा दरम्यान थॉमस यांना हृदयविकाराचा एक सौम्य झटकाही येऊन गेला. त्यांना श्वास घेणंही कठीण झालं होतं. दोघांनाही डायबेटीजसोबत हायपरटेन्शनचाही त्रास होता. त्यामुळे त्यांना वेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं.
उपचारा दरम्यान थॉमस आणि त्यांच्या पत्नीवर वेगवेगळ्या रुममध्ये उपचार सुरू होते. परंतु, त्यानंतर मात्र दोघांना ट्रान्सप्लान्ट आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. इथं ते एकमेकांना केवळ पाहू शकत होते.
दिल्ली हादरली; २०० जणांमध्ये करोनाची लक्षणं
नर्सही करोना पॉझिटिव्ह
दुसरीकडे, मरियम्मा यांनाही युरिनरी इन्फेक्शनसोबत बॅक्टेरियल इन्फेक्शनचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर जी नर्स या दोघांची काळजी घेत होती तीदेखील करोना पॉझिटिव्ह निघाली.
गेल्या आठवड्यांत उपचारानंतर या जोडप्याची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर रुग्णालयानं त्यांना ताबडतोब डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. अधिक काळ रुग्णालयात राहणं हेदेखील या जोडप्यासाठी धोकादायक होतं.
'महाराष्ट्रातून आले' सांगितल्यावर केली हत्या
मुलगा-सून इटलीमधून मायदेशात
या दाम्पत्याचा मुलगा आणि त्याचं कुटुंब २० फेब्रुवारी रोजी इटलीमधून मायदेशात परतलं होतं. त्यानंतर करोनाच्या भीतीनं हे संपूर्ण कुटुंब ५ मार्च रोजी करोना चाचणीसाठी रुग्णालयात दाखल झालं होतं. उल्लेखनीय म्हणजे या जोडप्यासहीत त्यांचा मुलगा, सून आणि आणखी दोन नातेवाईकांनाही डिस्चार्ज मिळाला.
डॉक्टर-नर्सेसच्या समर्पणाचं उदाहरण
इतके दिवस उपचारानंतर आणि डॉक्टरांनी घेतलेल्या काळजीमुळे त्यांना इथला लळा लागला होता. डॉक्टरांनीही अगदी आपल्या कुटुंबीयांप्रमाणे त्यांची काळजी घेतली. केरळचे अर्थ मंत्री थॉमस इसाक यांनी हे मेडिकल स्टाफच्या समर्पणाचं उत्तम उदाहरण असल्याचं म्हटलंय.
दिल्लीत येऊन गेलेल्या ६ जणांचा तेलंगणात करोनाने मृत्यू