अ‍ॅपशहर

९९ टक्के नागरिकांकडे आता आधार कार्ड

भारतातल्या १८ वर्षांवरील ९९ टक्के नागरिकांकडे आता आधार कार्ड आहे. १ अब्ज ११ कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी आधार कार्डासाठी नोंदणी केली आहे. कॅशलेस कारभाराकडे देश वळल्यानंतर ही नोंदणी वाढली आहे.

Maharashtra Times 28 Jan 2017, 11:23 am
मटा ऑनलाइन वृत्त ।नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 99 of indians over 18 now have aadhaar cards
९९ टक्के नागरिकांकडे आता आधार कार्ड


भारतातल्या १८ वर्षांवरील ९९ टक्के नागरिकांकडे आता आधार कार्ड आहे. १ अब्ज ११ कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी आधार कार्डासाठी नोंदणी केली आहे. कॅशलेस कारभाराकडे देश वळल्यानंतर ही नोंदणी वाढली आहे.

नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने आधारपे योजना आणल्यानंतर नोंदणीत वाढ झाली. अनेक सरकारी योजनांमधील लाभार्थींना थेट आधार कार्डाद्वारे पैसे बँक खात्यात मिळू लागले आहेत. पीडीएस, एलपीजी आणि मनरेगासारख्या योजनांच्या लाभार्थींचे पैसे थेट दिल्याने सरकारने गेल्या २ वर्षांत ३६ हजार कोटी रुपये वाचवले आहेत.

मार्च २०१४ ते मे २०१४ पर्यंत आधार कार्ड नोंदणी प्रतिदिन ३ ते ४ लाख होती ती ऑक्टोबर २०१६ पर्यंता प्रतिदिन ५ ते ६ लाखांपर्यंत वाढली आहे, तर आधार कार्डाची मागणी प्रतिदिन ७ ते ८ लाख आहे. 'आधार कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना कार्ड, पिन, पासवर्ड, मोबाइल असे काहीही लागत नाही. केवळ अंगठ्याच्या इम्प्रेशनद्वारे पेमेंट करता येते. त्यामुळे आधार कार्ड हे नोटाबंदीनंतर 'गेम चेंजर' झाले आहे,' असे माहिता-तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज