अ‍ॅपशहर

mp bus accident : शाब्बास! जीवाची बाजी लावत शिवराणीची कालव्यात उडी, दोघांना दिले जीवदान

मध्य प्रदेशात बसला मोठा अपघात झाला आहे. सीधी येथे प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात ३९ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर घटनास्थळापासून जवळच राहणाऱ्या एका मुलीने कालव्यात उडी घेत दोघांचे प्राण वाचवले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Feb 2021, 6:59 pm
सीधी, मध्य प्रदेशः सीधीमध्ये सकाळी झालेल्या बस दुर्घटनेत ३९ प्रवाशांचा ( mp bus accident ) बुडून मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून पीडितांना सर्वतोपरी मदत देण्याची घोषणा केली आहे. अपघातानंतर अपघाताच्या ठिकाणी सर्वात आधी पोहोचणाऱ्या शिवराणीने यामुलीने आपला जीव धोक्यात घालत कालव्यात उडी घेतली. तिने दोन जणांचे प्राण वाचवले. अपघाताबद्दलही तिने माहिती दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bus fell into a canal in Sidhi
जीवाची बाजी लावत तिने कालव्यात उडी घेतली, दोघांना दिले जीवदान


अपघाताच्या ठिकाणाजवळच आपलं घर आहे. सकाळी ७.३० च्या वाजेच्या सुमारास प्रवाशांनी भरलेली बस वेगात येत असल्याचं त्यांनी पाहिलं. पुलावरून पुढे जाताच बस अचानक कालव्यात कोसळली. शिवराणीला काहीच कळेनासं झालं. पण आहे त्या स्थिती ती अपघाताच्या ठिकाणी गेली, असं तिने सांगितलं.

जवळ जाऊन पाहिल्यावर बस कालव्यात बुडत असल्याचं शिवराणीने बघितलं. तिने कुठलाही विचार न करता कालव्यात उडी मारली आणि प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. खोल पाण्यातून दोन जणांना आपण किनाऱ्यावर आणलं. त्या दोघांचे प्राण वाचल्याबद्दल तिने समाधान व्यक्त केलं. बुडणाऱ्या प्रवाशांना वाचवण्यात आपल्या भावांनीही मदत केली, असं शिवाराणीने सांगितलं.

भीषण! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस कालव्यात कोसळली, ३८ मृतदेह हाती

बसमधील बहुतेक प्रवासी हे नर्सिंगचे विद्यार्थी होते. ते सर्वजण सीधीहून सतनाला परीक्षा देण्यासाठी जात होते. पण या बस अपघातात बहुतेक विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर रीवा विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये किती प्रवासी होते याची माहिती अद्याप प्रशासनाकडे नाही. प्रशासनाने मदतकार्यात खूप उशीर केल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.

Bus Accident : मध्य प्रदेश बस दुर्घटना; अमित शहांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

पंतप्रधान मोदींनी २ लाखांची मदत केली जाहीर

बस अपघातात ३९ प्रवाशांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसंच अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाखांची मदत घोषित केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज