अ‍ॅपशहर

३ कोटी जन्मांनंतर असे विचित्र मूल जन्माला येते; डॉक्टरांची माहिती

उत्तर प्रदेशातील अलीग़च्या क्वार्सी येथील वरुण हॉस्पिटलमध्ये माशासारख्या त्वचेचा विचित्र मुलगा जन्माला आला आहे. या वृत्तामुळे परिसरात या मुलाला पाहण्याची त्सुकता निर्माण झाली आहे. डॉक्टरांच्या मते, ३ कोटी मुले जन्माला आल्यानंतर एखादे अशा प्रकारचे मूल जन्माला येत असते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jul 2020, 8:52 pm
अलीगड: देशात तसेच जगभरात अनेक विचित्र मुलांचा जन्म झाल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो एकतो. कोणाला दोन डोकी असतात, तर कोणाला अधिक हात. कोणाला अधिक पाय असतात किंवा कुणाला कधी हात पाय नसतात, तर कोणाला एखादा अवयव नसतो. मात्र उत्तर प्रदेशातील अलीगडमधील क्वार्सी परिसरातील वरुण हॉस्पिटलमध्ये माशासारख्या त्वचेच्या विचित्र मुलाचा जन्म झाला आहे. डॉक्टरांच्या मते, ३ कोटी जन्म झाल्यानंतर एखादे अशा प्रकारचे मूल जन्माला येते. परंतु सर्वसाधारणपणे ही मुले जिवंत राहू शकत नाहीत. याचे कारण म्हणजे अशी जन्माला आलेली मुले बाहेरील परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाहीत. (a fish like baby has taken birth)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम माशासारखी त्वचा असलेले मूल


भारतातील अलिगड व्यतिरिक्त यापूर्वी दिल्लीच्या कस्तूरबा रुग्णालयात देखील अशा प्रकारच्या एका विचित्र मुलाचा जन्म झाला होता. डॉक्टर म्हणतात की हा प्रकार ‘एबीसीए-१२’ या जनुकांमुळे होतो.

डॉक्टर म्हणतात की अशा प्रकारची समस्या बदलणार्‍या जनुकांमुळे उग्भवते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. एक्स-एक्स (X-X) जनुकांमुळे मुलगी जन्माला येते. तर एक्स-वाय (X-Y) जनुकांमुळे मुलगा जन्माला येतो. या बरोबरच एक्स-एक्स-वाय (X-X-Y)या जनुकांमुळे मूल नपुंसक म्हणून जन्मला येते. एबीसीए-१२ जनुकाचे मूल मात्र अशा प्रकारे जन्माला येते. अशा प्रकारे परदेशात जन्माला आलेली काही मुले असून ती जिवंत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तथापि, अशा प्रकारे भारतात जन्माला आलेले कोणतेही मूल वाचलेले नाही.

वाचा: करोना: रुग्णसंख्येत मोठी वाढ; २४ तासात वाढले 'इतके' रुग्ण

अशी मुले खूपच कमी जन्माला येतात, असे एका खाजगी रुग्णालयाचे संचालक असलेले डॉ. संजय भार्गव म्हणाले. अशा प्रकारे जन्माला आलेल्या मुलांच्या शरीराचा आकार माश्यांसारखा असतो. या बरोबरच त्यांच्या त्वचेला हात लावल्यास त्यांची त्वचा तत्काळ गळून जाते, इतकी ती नाजूक असते. सुमारे ३ कोटी मुलांमध्ये अशा प्रकारचे एखादे मूल जन्माला येत असते. अशाप्रकारची मुले क्वचितच जगतात असे दिसून आले आहे. भारताचा विचार केल्यास देशात आतापर्यंत अशा प्रकारे जन्माला आलेली फक्त दोन किंवा तीनच मुले जगू शकली आहेत. अन्यथा दोन ते तीन दिवसांत ही मुले मरतात, अशी माहिती डॉ. संजय भार्गव यांनी दिली.

वाचा: फोटोफीचर: करोना; 'या' तीन गोष्टींनी वाढवलीय भारताची चिंता
वाचा: याला काय म्हणावे?; आयसोलेश वॉर्डमध्ये करोनारुग्णाचे मद्यपान

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज