अ‍ॅपशहर

ऑनलाइन शिक्षण घेता येत नसल्याने ९वीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

ही मुलगी सोमवार दुपारपासून बेपत्ता होती. घराजवळ असलेल्या वलनचेरी या निर्जन भागात तिचा जळालेला मृतदेह आढळून आला. तिच्या मृतदेहाजवळ केरोसिनची रिकामी बाटलीही सापडली. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. प्राथमिक तपासानुसार मुलीने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jun 2020, 7:29 pm
मलप्पूरम, केरळः लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहेत. पण सर्वांसाठी हे शिक्षण घेणे सोपे नाही. केरळच्या मलप्पूरम येथील एका ९ वी मध्ये शिकणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीने ऑनलाइन शिक्षण घेता येत नसल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम student allegedly commits suicide


घरची परिस्थिती बिकट असल्याने मुलीला ऑनलाइन क्लास जॉइन करता येत नव्हता. आपल्याला शिक्षण घेता येत नसल्यामुळे ती चिंतेत होती. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे, अशी माहिती मलपूरमचे पोलीस अधीक्षक यू अब्दुल करीम यांनी दिली.

ही मुलगी सोमवार दुपारपासून बेपत्ता होती. घराजवळ असलेल्या वलनचेरी या निर्जन भागात तिचा जळालेला मृतदेह आढळून आला. तिच्या मृतदेहाजवळ केरोसिनची रिकामी बाटलीही सापडली. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. प्राथमिक तपासानुसार मुलीने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी मंजेरी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

ही विद्यार्थीनी हुशार होती, असं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलं. तर आमच्याकडे छोटा टीव्ही आहे. पण तो गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्तीला टाकला आहे, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं. लॉकडाऊनमुळे कुठलाही रोजगार नसल्याने टीव्हीच्या दुरुस्तीसाठी तिच्या कुटुंबीयांकडे पैसे नाहीएत.

राज्याचे शिक्षणमंत्री सी. रविंद्रनाथ यांनी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी अहवाल मागवला आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सोमवारी व्हर्च्युअल क्लालेसच्या कार्यक्रमाचे उद्धघाटन केले होते. नवी यंत्रणा क्रांती घडवेल असं ते म्हणाले होते. सरकारच्या व्हर्च्युअल क्लासेस योजनेमुळे मलप्पूरम आणि वायनाड जिल्ह्यातील २० हजार गरीब विद्यार्थी वंचित आहेत. त्यांच्याकडे ना टीव्ही आहे ना मोबाइल. सरकारने प्रसिद्धीसाठी गरीब विद्यार्थ्यांची कोंडी केली, असा आरोप स्थानिक नेते अबिद हुसेने थनगल यांनी केला.

राहुल गांधींचा मदतीचा हात

काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी टीव्ही आणि मोबाइल नसलेल्या जिल्ह्यातील कुटुंबांची माहिती मागितली आहे. त्यांनी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. स्मार्टफोन, कम्प्युटर आणि त्यासाठी आवश्यक असलेले इंटरेनेट सुविधा नसल्याने गरीब विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आशा विद्यार्थ्यांना आमची मदत करण्याची इच्छा आहे. त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या वस्तू आम्ही पुरवू, असं राहुल गांधी यांनी या घटनेची दखल घेत पत्रात म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज