नवी दिल्ली: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने आज वाघा सीमेवरचं आसमंत दुमदुमून गेलं. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा अखंड घोषणांमुळे अभूतपूर्व असं वातावरण सीमेवर पाहायला मिळालं. पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून झालेल्या या शिवस्तुतीला तसंच खास निमित्तही होतं...
छत्रपती संभाजीराजे आज वाघा सीमेवरील बीटिंग रीट्रीट सोहळ्याला उपस्थित होते. काही क्षणांतच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज येथे आल्याची वार्ता कानोकानी पसरली आणि उपस्थितांमध्ये एकच उत्साह संचारला. शिवरायांच्या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमून गेला. छत्रपती संभाजीराजेंना पाहण्यासाठी व त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. वाघा सीमेवरील हे अनोखं स्वागत पाहून संभाजीराजे भारावले. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करतानाच आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
छत्रपती घराण्यावर लोक आजही जीव ओवाळून टाकतात. माझा जन्म या घराण्यात झाला यापेक्षा मोठे भाग्य जगात कोणतेही नाही, असे संभाजीराजेंनी नमूद केले आहे. हे प्रेम, ही आत्मियता पाहून माझे मन भारावून गेले, डोळे अक्षरशः पाणावले. महाराष्ट्राच्या मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर, आमच्या रणमर्द मावळ्यांचा उत्साह, त्यांची माझ्याविषयीची प्रीती मनाला शिवणार नाही तर काय?, अशा भावना संभाजीराजेंनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
छत्रपती संभाजीराजे आज वाघा सीमेवरील बीटिंग रीट्रीट सोहळ्याला उपस्थित होते. काही क्षणांतच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज येथे आल्याची वार्ता कानोकानी पसरली आणि उपस्थितांमध्ये एकच उत्साह संचारला. शिवरायांच्या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमून गेला. छत्रपती संभाजीराजेंना पाहण्यासाठी व त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. वाघा सीमेवरील हे अनोखं स्वागत पाहून संभाजीराजे भारावले. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करतानाच आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
शिवरायांचे विचार आत्मसात करा
छत्रपती घराण्यावर लोक आजही जीव ओवाळून टाकतात. माझा जन्म या घराण्यात झाला यापेक्षा मोठे भाग्य जगात कोणतेही नाही, असे संभाजीराजेंनी नमूद केले आहे. हे प्रेम, ही आत्मियता पाहून माझे मन भारावून गेले, डोळे अक्षरशः पाणावले. महाराष्ट्राच्या मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर, आमच्या रणमर्द मावळ्यांचा उत्साह, त्यांची माझ्याविषयीची प्रीती मनाला शिवणार नाही तर काय?, अशा भावना संभाजीराजेंनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या.