जयपूर:
पोलिसांच्या वागणूकीला कंटाळून एका बलात्कार पीडितेने पोलीस स्टेशनातच आत्मदहन केल्याची धक्कादायक घटना जयपूर येथील वैशालीनगर परिसरात घडली आहे. या महिलेचा सवाई मानसिंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पुढील तपास सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी या महिलेवर एका २९ वर्षीय तरुणाने बलात्कार केला होता. या महिलेने तशी रीतसर तक्रारही वैशालीनगर पोलीस स्टेशनात दाखल केली होती. त्या तक्रारीकडे पोलिसांनी पूर्णपणे कानाडोळा केल्याचा या महिलेचा आरोप होता. दोन महिन्यांमध्ये पोलिसांनी आरोपीला अटकही केली नव्हती. तसंच कोणत्याही प्रकारची चौकशीही केली नव्हती असं या महिलेचं म्हणणं होतं. उलट तक्रार मागे घेण्यासाठीच पोलीस तिच्यावर दबाव आणत होते अशी माहिती तिच्या पतीने दिली आहे.
रविवारी आपल्या मुलाला घेऊन ही महिला पोलीस स्टेशनात आली होती. आरोपीला अटक करा अशी मागणीही तिने केली होती. त्यानंतर काही क्षणांतच तिने आत्मदहन केलं. पोलिसांनी तातडीने तिला सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल केलं. जिथे उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या वाईट वागणुकीमुळेच या महिलेने आत्मदहन केल्याचा आरोप तिच्या पतीने लावला आहे.
तर पोलिसांनी मात्र याप्रकरणी आपण योग्य तपास करत होतो अशी माहिती दिली आहे. ' आरोपी पुरूष या महिलेचा नातेवाईक होता. त्यामुळे याप्रकरणी आम्हाला थोडी वेगळी माहिती मिळत होती. यामुळेच तपास प्रक्रियेला वेळ लागत होता' असं पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांच्या वागणूकीला कंटाळून एका बलात्कार पीडितेने पोलीस स्टेशनातच आत्मदहन केल्याची धक्कादायक घटना जयपूर येथील वैशालीनगर परिसरात घडली आहे. या महिलेचा सवाई मानसिंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पुढील तपास सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी या महिलेवर एका २९ वर्षीय तरुणाने बलात्कार केला होता. या महिलेने तशी रीतसर तक्रारही वैशालीनगर पोलीस स्टेशनात दाखल केली होती. त्या तक्रारीकडे पोलिसांनी पूर्णपणे कानाडोळा केल्याचा या महिलेचा आरोप होता. दोन महिन्यांमध्ये पोलिसांनी आरोपीला अटकही केली नव्हती. तसंच कोणत्याही प्रकारची चौकशीही केली नव्हती असं या महिलेचं म्हणणं होतं. उलट तक्रार मागे घेण्यासाठीच पोलीस तिच्यावर दबाव आणत होते अशी माहिती तिच्या पतीने दिली आहे.
रविवारी आपल्या मुलाला घेऊन ही महिला पोलीस स्टेशनात आली होती. आरोपीला अटक करा अशी मागणीही तिने केली होती. त्यानंतर काही क्षणांतच तिने आत्मदहन केलं. पोलिसांनी तातडीने तिला सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल केलं. जिथे उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या वाईट वागणुकीमुळेच या महिलेने आत्मदहन केल्याचा आरोप तिच्या पतीने लावला आहे.
तर पोलिसांनी मात्र याप्रकरणी आपण योग्य तपास करत होतो अशी माहिती दिली आहे. ' आरोपी पुरूष या महिलेचा नातेवाईक होता. त्यामुळे याप्रकरणी आम्हाला थोडी वेगळी माहिती मिळत होती. यामुळेच तपास प्रक्रियेला वेळ लागत होता' असं पोलिसांनी सांगितलं आहे.