नवी दिल्लीः बॉलिवूड अभिनेता आमीर खान सकाळपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आमीरने तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगन यांची पत्नी एमिली एर्दोगन यांची भेट घेतली आहे. ही भेट खासगी होती. पण आमीर खानच्या भारतातील विरोधकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन हे सतत भारतविरोधी वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. काश्मीर मुद्यावर त्यांनी उघडपणे भारताला विरोध केला होता. आमीर खानचा विरोध होत असताना दुसरीकडे त्याच्या बचावासाठी काही जण पुढे आले आहेत. आमीर खान कुणालाही भेटला तरी त्याने काय फरक पडणार आहे? असा युक्तीवाद केला जातोय.
असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून आमीर खानने मोठं वक्तव्य केलं होतं. भारतात भीती वाटू लागली आहे, असं आमीर म्हणाला होता. अशा स्थितीत भाजप, आरएसएस आणि विहिंपशी संबंधित बर्याच लोकांना आमीर खानची तुर्कीतील ही भेट आवडलेली नाही. तर हा वाद विनाकारण आहे, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.
आमीर खानच्या विषयाबद्दल आपल्याला कुठलीही माहिती नाही. आपण तुर्की विषयी एक लेख वाचला होता त्यानंतर ट्वीट केलं होतं. आमीर खान कुणालाही भेटू शकतो. त्यासाठी तो स्वतंत्र आहे. आमीर खान हा काही आमचा दूत नाही आणि आमचा खासदारही नाही अन् सरकारी अधिकारी नाही. यामुळे त्याच्या भेटण्यात अडचण काय असू शकते? भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दाऊद इब्राहिम आमीर खान भेटला असता तर ते चुकीचे होते. कुणाला भेटायचे कुणाला नाही हा आमीर खानचा विषय आहे. पण आपला तुर्कीला विरोधा आहे, असं काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.
या संपूर्ण वादावर भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमीर खानची स्वतंत्र आहे. पण देशाबद्दल एखाद्या नागरिकाची काही जबाबदारी नाहीए का? भारतीयांच्या प्रेमाने आमीर खान मोठा झाला आहे. तुर्की नेहमीच भारताविरूद्ध बोलतो. आमीर खानच्या हृदयातही भारत आहे, याची आम्हाला खात्री आहे. पण तो तुर्कीच्या पहिल्या महिलेला कसा काय भेटू शकतो. हा तोच तुर्की आहे ज्याने दिल्लीतल्या दंगलीत मुस्लिमांचा छळ होत आहे असं म्हटलं होतं, असं भाटिया म्हणाले.
तुम्ही आणि तुमच्या आईने चीनकडून पैसे घेतले, नड्डांचा राहुल गांधींवर थेट आरोप
नेतृत्व बदलासाठी जवळपास १०० नेत्यांचे सोनियांना पत्र? काँग्रेसने दिले हे उत्तर
या वादात विश्व हिंदू परिषदेनेही उडी घेतलीय. आजकाल काही व्यक्तींना आणि कलाकारांचा भारत विरोधकांशी प्रेम उफाळून आलं आहे. तुर्कीच्या पहिल्या महिलेला भेटून एखाद्या भारतीय अभिनेत्याचा उत्साह बराच काही दर्शवतो, असं व्हीएचपीचे प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले. सुब्रमण्यन स्वामी यांनीही ट्विट करत आमीर खानवर निशाणा साधला आहे.
या विषयावर कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी भूमिका स्पष्ट केली. सोशल मीडियावरून ट्रोलिंग करणं बंद झालं पाहिजे. आमीर खान कोणाला भेटतो आणि तो काय करतो ही त्याची चिंता आहे, असं त्या म्हणाल्या.
तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन हे सतत भारतविरोधी वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. काश्मीर मुद्यावर त्यांनी उघडपणे भारताला विरोध केला होता. आमीर खानचा विरोध होत असताना दुसरीकडे त्याच्या बचावासाठी काही जण पुढे आले आहेत. आमीर खान कुणालाही भेटला तरी त्याने काय फरक पडणार आहे? असा युक्तीवाद केला जातोय.
असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून आमीर खानने मोठं वक्तव्य केलं होतं. भारतात भीती वाटू लागली आहे, असं आमीर म्हणाला होता. अशा स्थितीत भाजप, आरएसएस आणि विहिंपशी संबंधित बर्याच लोकांना आमीर खानची तुर्कीतील ही भेट आवडलेली नाही. तर हा वाद विनाकारण आहे, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.
आमीर खानच्या विषयाबद्दल आपल्याला कुठलीही माहिती नाही. आपण तुर्की विषयी एक लेख वाचला होता त्यानंतर ट्वीट केलं होतं. आमीर खान कुणालाही भेटू शकतो. त्यासाठी तो स्वतंत्र आहे. आमीर खान हा काही आमचा दूत नाही आणि आमचा खासदारही नाही अन् सरकारी अधिकारी नाही. यामुळे त्याच्या भेटण्यात अडचण काय असू शकते? भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दाऊद इब्राहिम आमीर खान भेटला असता तर ते चुकीचे होते. कुणाला भेटायचे कुणाला नाही हा आमीर खानचा विषय आहे. पण आपला तुर्कीला विरोधा आहे, असं काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.
या संपूर्ण वादावर भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमीर खानची स्वतंत्र आहे. पण देशाबद्दल एखाद्या नागरिकाची काही जबाबदारी नाहीए का? भारतीयांच्या प्रेमाने आमीर खान मोठा झाला आहे. तुर्की नेहमीच भारताविरूद्ध बोलतो. आमीर खानच्या हृदयातही भारत आहे, याची आम्हाला खात्री आहे. पण तो तुर्कीच्या पहिल्या महिलेला कसा काय भेटू शकतो. हा तोच तुर्की आहे ज्याने दिल्लीतल्या दंगलीत मुस्लिमांचा छळ होत आहे असं म्हटलं होतं, असं भाटिया म्हणाले.
तुम्ही आणि तुमच्या आईने चीनकडून पैसे घेतले, नड्डांचा राहुल गांधींवर थेट आरोप
नेतृत्व बदलासाठी जवळपास १०० नेत्यांचे सोनियांना पत्र? काँग्रेसने दिले हे उत्तर
या वादात विश्व हिंदू परिषदेनेही उडी घेतलीय. आजकाल काही व्यक्तींना आणि कलाकारांचा भारत विरोधकांशी प्रेम उफाळून आलं आहे. तुर्कीच्या पहिल्या महिलेला भेटून एखाद्या भारतीय अभिनेत्याचा उत्साह बराच काही दर्शवतो, असं व्हीएचपीचे प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले. सुब्रमण्यन स्वामी यांनीही ट्विट करत आमीर खानवर निशाणा साधला आहे.
या विषयावर कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी भूमिका स्पष्ट केली. सोशल मीडियावरून ट्रोलिंग करणं बंद झालं पाहिजे. आमीर खान कोणाला भेटतो आणि तो काय करतो ही त्याची चिंता आहे, असं त्या म्हणाल्या.