अ‍ॅपशहर

.... तर काँग्रेसने अहंकार सोडावा

'गुजरातमध्ये जिंकायचं असेल तर काँग्रेसने आमच्या सारख्या चुका करू नये. काँग्रेसने अहंकार सोडून काम करावं. तळागाळापर्यंतचा लोकसंपर्क वाढवावा,' असा सल्ला आम आदमी पक्षाने काँग्रेसला दिला आहे.

Maharashtra Times 12 Nov 2017, 9:43 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aap member gpal rai gave congress advice on gujarat elections
.... तर काँग्रेसने अहंकार सोडावा


'गुजरातमध्ये जिंकायचं असेल तर काँग्रेसने आमच्या सारख्या चुका करू नये. काँग्रेसने अहंकार सोडून काम करावं. तळागाळापर्यंतचा लोकसंपर्क वाढवावा,' असा सल्ला आम आदमी पक्षाने काँग्रेसला दिला आहे.

'आप'चे गुजरातचे प्रभारी गोपाल राय यांनी काँग्रेसला हा सल्ला दिला. 'पंजाब विधानसभा निवडणुकीत आम्ही अति आत्मविश्वासात गेलो होतो. त्यामुळे आम्हाला पराभवाला सामोरे जावं लागलं. आम्ही केलेली ही चूक काँग्रेसने गुजरातमध्ये करू नये,' असं सांगतानाच पंजाबच्या निवडणुकीनंतर आम्ही सहा महिने सुस्त झालो नसतो तर गुजरातमध्ये आम्ही सक्षम पर्याय देण्याच्या स्थितीत असतो, अशी कबुली राय यांनी दिली.

'लोकांना गुजरातमध्ये बदल हवा आहे. गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेत येऊ शकते. पण त्यासाठी त्यांनी अहंकार सोडावा आणि तळागाळापर्यंत जाऊन काम करावं. गुजरातच्या लोकांचा कल काँग्रेसच्या दिशेने आहे. मात्र काँग्रेस लोकांशी संपर्क करण्यात कमी पडताना दिसत आहे. दुसरीकडे भाजप घाबरली आहे, पण ते तळागाळा पोहचून काम करत आहेत,' असंही ते म्हणाले.

'आमचे कार्यकर्ते डोअर टू डोअर कँम्पेन करत आहेत. तिथे त्यांना भाजपचे कार्यकर्ते भेटतात. पण काँग्रेसचे कार्यकर्ते दिसत नाहीत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अति आत्मविश्वास आल्याचं दिसतंय. त्यांना आजच आमदार बनल्याचे स्वप्न पडत आहे. पण त्यांनी वेळीच सावध व्हावं. नाही तर त्याचा त्यांना फटका बसू शकतो,' असं राय यांनी शेवटी स्पष्ट केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज