मध्य प्रदेशः रीवा येथील राष्ट्रीय महामार्ग-३० वर भीषण अपघात घडला आहे. या अपघातात १४ जण ठार झाले असून ४० जखमी झाले आहेत. हैदराबादहून गोरखपूरला जाणाऱ्या प्रवासी बसला हा अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास हा अपघात झाला असून पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. बचावकार्याला सुरूवात झाली आहेत.
शुक्रवारी उत्तर प्रदेशची असणारी बस हैदराबादहून गोरखपूरकडे जात होती. जबलपूरहून जात असताना रिवा येथील घाटमार्गावरुन खाली उतरत असताना बस पलटी झाली. शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, बस ट्रकला धडकून पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अद्याप नेमकं कारण स्पष्ट झालं नाहीये.
वाचाः मुकेश अंबानीचे पुत्र अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला, तब्बल तीन तास चर्चा
वाचाः मुंबई पोलिस दलातील ४० हजार पोलिसांना अखेर मोठा दिलासा; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
अपघात झालेल्या बसमध्ये सगळे मजूर होते. जे दिवाळीसाठी आपल्या गावी निघाले होते. अपघातात ४० जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर, १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान अधिकाऱ्यांकडून मृतांच्या आकड्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. अपघातानंतर काही जण बसमध्येच अडकले होते. त्यांना मोठ्या मुश्किलीने बाहेर काढण्यात आले.
ट्रॉलीने बसला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. रीवा येथील सुहागी पहाडी जवळ ही घटना घडली असल्याचं रिवाचे पोलिस अधिक्षक नवनीत भसीन यांनी म्हटलं आहे. तसंच, बसमध्ये असलेले सर्व प्रवासी हे उत्तर प्रदेशचे स्थानिक असल्याचं बोललं जातंय. जखमी असलेल्या ४० जणांपैकी २० जणांना प्रयागराजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
वाचाः नव्या सरकारला एसटीचा विसर? प्रवाशांकडून विचारला जातोय संतप्त सवाल, कारण...
शुक्रवारी उत्तर प्रदेशची असणारी बस हैदराबादहून गोरखपूरकडे जात होती. जबलपूरहून जात असताना रिवा येथील घाटमार्गावरुन खाली उतरत असताना बस पलटी झाली. शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, बस ट्रकला धडकून पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अद्याप नेमकं कारण स्पष्ट झालं नाहीये.
वाचाः मुकेश अंबानीचे पुत्र अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला, तब्बल तीन तास चर्चा
वाचाः मुंबई पोलिस दलातील ४० हजार पोलिसांना अखेर मोठा दिलासा; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
अपघात झालेल्या बसमध्ये सगळे मजूर होते. जे दिवाळीसाठी आपल्या गावी निघाले होते. अपघातात ४० जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर, १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान अधिकाऱ्यांकडून मृतांच्या आकड्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. अपघातानंतर काही जण बसमध्येच अडकले होते. त्यांना मोठ्या मुश्किलीने बाहेर काढण्यात आले.
ट्रॉलीने बसला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. रीवा येथील सुहागी पहाडी जवळ ही घटना घडली असल्याचं रिवाचे पोलिस अधिक्षक नवनीत भसीन यांनी म्हटलं आहे. तसंच, बसमध्ये असलेले सर्व प्रवासी हे उत्तर प्रदेशचे स्थानिक असल्याचं बोललं जातंय. जखमी असलेल्या ४० जणांपैकी २० जणांना प्रयागराजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
वाचाः नव्या सरकारला एसटीचा विसर? प्रवाशांकडून विचारला जातोय संतप्त सवाल, कारण...