अ‍ॅपशहर

पवारांना टार्गेट करणारे हे सरकार खुनशी: राहुल गांधी

राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पवारांवरील कारवाईवरून काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. 'महाराष्ट्रातील निवडणुकांवर डोळा ठेवून सरकार खुनशीपणे वागत असून शरद पवारांना लक्ष्य करत आहे,' असा आरोप राहुल यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Sep 2019, 12:50 pm
नवी दिल्ली: राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पवारांवरील कारवाईवरून काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. 'महाराष्ट्रातील निवडणुकांवर डोळा ठेवून सरकार खुनशीपणे वागत असून शरद पवारांना लक्ष्य करत आहे,' असा आरोप राहुल यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम action against pawar political opportunism says rahul gandhi
पवारांना टार्गेट करणारे हे सरकार खुनशी: राहुल गांधी


शिखर बँकेतील घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार यांनी स्वत:हून ईडीच्या कार्यालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार आज ते ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. पवारांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनंही संघर्षाचा पवित्रा घेतला असून राज्यभरात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. विरोधी पक्षांनीही सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी सरकारच्या सूडाच्या राजकारणावर टीका केल्यानंतर आज राहुल यांनीही ट्विट करून मोदी सरकारला लक्ष्य केले. 'सरकारच्या सूडाच्या राजकारणाचं शरद पवार हे ताजं उदाहरण आहे. निवडणुकीला महिना उरला असताना पवारांवर कारवाईची वेळ निवडण्यात आली आहे. हा राजकीय संधीसाधूपणाचा प्रकार आहे,' असं राहुल यांनी म्हटलं आहे.

विशेष: कारवाई की सूडाचे राजकारण?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज