मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
अभिनेता प्रकाश राज यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या खूनावर मौन धारण केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेबाबत असेच मौन बाळगले तर आपण आपल्याला मिळालेले ५ राष्ट्रीय पुरस्कार परत करू अशी धमकीही प्रकाश राज यांनी दिली आहे. गौरी लंकेश यांना मारणारे पकडले जातील अथवा नाही, मात्र सोशल मीडियावर लंकेश यांच्या खूनाचा उत्सव साजरा करणारे देखील आहेत अशा शब्दात प्रकाश राज यांनी अशा प्रवृत्तीचा निषेध केला आहे. खूनाचा उत्सव साजरा करणारे हे लोक कोण आहेत, तसेच ते कोणती विचारधारा मानतात हे सर्वांनाच माहित आहे. यांपैकी बरेचसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावर फॉलोही करतात. याची मला भीती वाटते असे म्हणत आपला देश कोणत्या दिशेला जात आहे असा सवालही प्रकाश राजने उपस्थित केला आहे.
प्रकाश राज बेंगळुरूत डेमॉक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात 'डीवायएफआय'च्या ११व्या राज्य संमेलनाला संबोधित करत होते. चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकांसाठी लोकप्रिय असलेले प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हटले, की पंतप्रधान हे माझ्यापेक्षाही चांगले अभिनेते आहेत. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा उत्सव साजरा करणारांवरही प्रकाश राज बरसले.
मी एक लोकप्रिय अभिनेता आहे, असे म्हणत तुम्हाला वाटते का की मी माझा अभिनय चांगल्याप्रकारे ओळखू शकत नाही? असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. गौरी लंकेश यांच्या खून प्रकरणावर पंतप्रधान मोदी यांनी धारण केलेल्या मौनामुळे आपण चिंतीत असल्याचेही ते पुढे म्हणाले. या घटनेबाबत मौन बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रूरतेला चालना देत आहेत का, आणि याचमुळे त्यांचे फॉलोअर्स सोशल मीडियावर उत्सव साजरा करत आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
अभिनेता प्रकाश राज यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या खूनावर मौन धारण केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेबाबत असेच मौन बाळगले तर आपण आपल्याला मिळालेले ५ राष्ट्रीय पुरस्कार परत करू अशी धमकीही प्रकाश राज यांनी दिली आहे. गौरी लंकेश यांना मारणारे पकडले जातील अथवा नाही, मात्र सोशल मीडियावर लंकेश यांच्या खूनाचा उत्सव साजरा करणारे देखील आहेत अशा शब्दात प्रकाश राज यांनी अशा प्रवृत्तीचा निषेध केला आहे. खूनाचा उत्सव साजरा करणारे हे लोक कोण आहेत, तसेच ते कोणती विचारधारा मानतात हे सर्वांनाच माहित आहे. यांपैकी बरेचसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावर फॉलोही करतात. याची मला भीती वाटते असे म्हणत आपला देश कोणत्या दिशेला जात आहे असा सवालही प्रकाश राजने उपस्थित केला आहे.
प्रकाश राज बेंगळुरूत डेमॉक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात 'डीवायएफआय'च्या ११व्या राज्य संमेलनाला संबोधित करत होते. चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकांसाठी लोकप्रिय असलेले प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हटले, की पंतप्रधान हे माझ्यापेक्षाही चांगले अभिनेते आहेत. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा उत्सव साजरा करणारांवरही प्रकाश राज बरसले.
मी एक लोकप्रिय अभिनेता आहे, असे म्हणत तुम्हाला वाटते का की मी माझा अभिनय चांगल्याप्रकारे ओळखू शकत नाही? असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. गौरी लंकेश यांच्या खून प्रकरणावर पंतप्रधान मोदी यांनी धारण केलेल्या मौनामुळे आपण चिंतीत असल्याचेही ते पुढे म्हणाले. या घटनेबाबत मौन बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रूरतेला चालना देत आहेत का, आणि याचमुळे त्यांचे फॉलोअर्स सोशल मीडियावर उत्सव साजरा करत आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.