नवी दिल्ली : निवडणुकीदरम्यान होणाऱ्या बोगस मतदानाला आळा बसावा, यासाठी मतदान ओळखपत्र आधार कार्डला जोडावे आणि तसे निर्देश निवडणूक आयोगाने द्यावेत, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर आज, मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेत्या आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. आधार कार्ड मतदान ओळखपत्राशी जोडल्यामुळे घटनेच्या मूलभूत अधिकारांना कुठलाही धक्का पोहोचत नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
‘आधार कार्ड’ला मतदान ओळखपत्र जोडा
निवडणुकीदरम्यान होणाऱ्या बोगस मतदानाला आळा बसावा, यासाठी मतदान ओळखपत्र आधार कार्डला जोडावे आणि तसे निर्देश निवडणूक आयोगाने द्यावेत, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स 16 Jul 2019, 4:00 am