अ‍ॅपशहर

भारतीयांनो, श्रीलंकेत जाऊ नका: भारत सरकार

श्रीलंकेत आठवड्याभरात पुन्हा बॉम्बस्फोट झाल्याने भारताने आपल्या नागरिकांना श्रीलंकेत न जाण्याचा सल्ला दिला आहे. तशी मार्गदर्शक सूचनाही भारताने जारी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Apr 2019, 9:06 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sri-lanka-blasts3


श्रीलंकेत आठवड्याभरात पुन्हा बॉम्बस्फोट झाल्याने भारताने आपल्या नागरिकांना श्रीलंकेत न जाण्याचा सल्ला दिला आहे. तशी मार्गदर्शक सूचनाही भारताने जारी केली आहे.

श्रीलंकेत २१ एप्रिल रोजी ९ स्फोट झाले होते. त्यात ३०० लोक ठार झाले होते. त्यानंतर आज पुन्हा श्रीलंकेत स्फोट झाला असून त्यात १५ लोक ठार झाले आहेत. त्यामुळे श्रीलंकेत अद्यापही अतिरेक्यांचा खात्मा झालेला नाही. अजूनही श्रीलंकेत अतिरेक्यांचा शोध घेतला जात असून येथील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे भारताने आपल्या नागरिकांना श्रीलंकेत न जाण्याचा सल्ला दिला आहे. श्रीलंकेत जाणं अत्यंत महत्त्वाचंच असेल तर भारतीय उच्चायुक्तांशी संपर्क साधून त्यांची मदत घ्या, असं भारत सरकारने जारी केलेल्या जाहिरातीत म्हटलं आहे. कोलंबोतील भारताच्या उच्चायुक्तांच्या संकेतस्थळावर भारत सरकारने श्रीलंकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबर दिले आहेत.

दरम्यान, अतिरेकी अजूनही श्रीलंकेतील हॉटेल, पर्यटन स्थळ, शिक्षण संस्था, विमानतळ, शॉपिंग मॉल, गर्दीची ठिकाणं, मार्केट, सरकारी कार्यालये, क्लब, रेस्टॉरन्ट, प्रार्थना स्थळं, पार्क, सांस्कृतिक कार्यक्रम आणि रुग्णालयात हल्ला करू शकतात, असा इशारा अमेरिकेने आधीच दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज