अ‍ॅपशहर

देशात हिंदूच अशांतता माजवतात... या वक्तव्यावरून राजीव धवन यांचा यू-टर्न

रामजन्मभूमी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना अॅड. राजीव धवन यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. 'देशातील वातावरण मुस्लिमांनी नव्हे तर हिंदूंनी बिघडवलं आहे,' असं ते म्हणाले होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Nov 2019, 11:49 am
नवी दिल्ली: 'देशातील शांतता मुस्लिम नव्हे तर हिंदू लोकच भंग करतात,' या वक्तव्याबद्दल अयोध्या प्रकरणात सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाची बाजू मांडणारे वकील राजीव धवन यांनी खुलासा केला आहे. 'माझं ते वक्तव्य सर्वसामान्य हिंदूंबद्दल नव्हतं. हिंसाचार, सामूहिक हल्ले, बाबरी मशिद उद्ध्वस्त केल्याच्या घटनांचं समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील लोकांबद्दल होतं,' असा खुलासा धवन यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rajeev-Dhavan


अयोध्या निकाल: मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड दाखल करणार पुनर्विचार याचिका

रामजन्मभूमी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना धवन यांनी हे वक्तव्य केलं होतं. 'देशातील वातावरण मुस्लिमांनी नव्हे तर हिंदूंनी बिघडवलं आहे,' असं ते म्हणाले होते. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. त्या संदर्भात 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी खुलासा केला आहे. 'मी जेव्हा कधी हिंदूंबद्दल बोलतो तेव्हा मी सर्वसामान्य हिंदू समाजाविषयी बोलत नाही. बाबरी मशिद पाडणाऱ्या संघ स्वयंसेवकांच्या संदर्भात मी ते बोलतो. माझं वक्तव्य सरसकट सर्व हिंदूंशी जोडण्याचा खोडसाळपणा वृत्तवाहिन्यांनी केला आहे,' असं ते म्हणाले.

गोडसे देशभक्त; साध्वींच्या विधानाने लोकसभेत गदारोळ

'बाबरी मशीद प्रकरणात न्यायालयात वक्फ बोर्डाची बाजू मांडताना मी अनेकदा संघ परिवारावर टीका केली आहे. बाबरी मशिद पाडणारे हिंदू तालिबानी आहेत, असं मी म्हटलं आहे. त्याचा सर्वसामान्य हिंदूंशी संबंध नाही,' असंही त्यांनी सांगितलं.
सुमारे ७० वर्षे देशाचं राजकारण व समाजकारण ढवळून काढणाऱ्या रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं ९ नोव्हेंबर रोजी निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त २.७ एकर जमीन राम लल्लाला देण्याचा निर्णय न्यायालयानं दिला. त्याचबरोबर तीन महिन्यात ट्रस्ट स्थापन करून मंदिर उभारणीचा आराखडा तयार करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. तसंच, मशिद बांधण्यासाठी पाच एकर जागा देण्याचे आदेशही सरकारला दिले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज