अ‍ॅपशहर

inside story : तालिबानची दुतावासावर वक्रदृष्टी, भारताने 'असं' सुरक्षितपणे बाहेर काढले कर्मचाऱ्यांना

काबुलमधील भारतीय दुतावासातील कर्मचारी अडकले होते. शर्थीच्या प्रयत्नानंतर त्यांना सुरक्षितपणे तालिबानच्या तावडीतून बाहेर काढून मायदेशी आणण्यात आलं. त्यांना ज्या गंभीर परिस्थितीत सुरक्षित आणलं गेलं, हे आता समोर आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Aug 2021, 5:05 pm
नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाचे C-17 ही वाहतुकीचं दोन विमानांनी १५ ऑगस्टला उड्डाण केलं. काबुलमधील भारतीय दुतावासातील कर्मचारी आणि दुतावासाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आयटीबीपीच्या जवानांना घेण्यासाठी ही विमानं ( ambassador evacuating kabul ) निघाली. किती कठीण परिस्थितीत आणि आव्हानांवर मात करत दुतावासाचे कर्मचारी आणि जवानांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं, याची माहिती मंगळवारी समोर आली. १५ आणि १६ ऑगस्टच्या रात्री अफगाणिस्तानमध्ये अतिशय गंभीर स्थिती झाली होती. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची कुठलीही शक्यता दिसत नव्हती. भारतीय दुतावासावर तालिबानची बारीज नजर होती. आणि अतिशय कडक सुरक्षा असलेल्या ग्रीन झोनचे तालिबानने उल्लंघन केले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम afghanistan crisis indian embassy officials including ambassador evacuating kabul
तालिबानची दुतावासावर होती वक्रदृष्टी, भारताने 'असं' सुरक्षितपणे बाहेर काढले कर्मचाऱ्यांना


तालिबानी दहशतवाद्यांनी साहिर व्हिसा एजन्सीवर छापा मारला. ही एजन्सी भारतात येण्यासाठी इच्छुक असलेल्या अफगाण नागरिकांच्या व्हिसाची प्रक्रिया बघते. हवाई दलाच्या पहिल्या विमानाने काल ४५ भारतीय कर्मचाऱ्यांची पहिली बॅच दाखल झाली. या कर्मचाऱ्यांना सुरवातीला तालिबान्यांनी विमानतळावर अडवलं. तालिबानी दहशतवाद्यांनी विमानतळावर वाढत असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांमधील काही जणाचं सामानही हिसकावून घेतलं.

काबूलहून भारतीय हवाईदलाचं C-17 विमान गुजरातमध्ये दाखल, 'वंदे मातरम'च्या घोषणा

अफगाणिस्तानमधील अतिशय आव्हानात्मक आणि अराजकतेच्या स्थितीत भारताच्या पहिल्या विमानाने काबुलमधून उड्डाण केलं. यावेळी देशातून बाहेर पडण्यासाठी मोठ्या संख्येत अफगाण नागरिक विमानतळावर पोहोचले होते. भारतीय दुतावास आणि सुरक्षा दलाच्या इतर सदस्यांना बाहेर काढण्यात अडचणी आल्या. कारण विमानतळवार विमानतळावर मोठ्या संख्येत अफगाण नागरिकांनी गर्दी केल्याने वाहतूक बंद केली गेली होती. यामुळे त्यांना बाहेर काढता आलं नाही. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकेन यांच्यात रात्री उशिरा बातचीत झाली यानंतर भारतीय कर्मचाऱ्यांना आज सकाळी काबुल विमानतळावर घेऊन जाणण्यात मदत मिळाली, असं बोललं जातंय. भारतीय दुतावासातील १२० हून अधिक कर्मचारी होती. यात राजदूत रुद्रेंद्र टंडन हे हवाई दलाच्या दुसऱ्या C-17 विमानात बसले. त्यांना आज सकाळी सुरक्षितपणे अफगाण हवाई क्षेत्रातून बाहेर काढण्यात आलं. हे विमान सकाळी १० वाजेच्या जवळपास दिल्लीत पोहोचलं.

NSA अजित डोवाल अॅक्शनमध्ये, अफगाणिस्तातील भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज