वाराणसीः
गेल्या पाच वर्षांत देशातील एकाही मंदिरावर कोणताही हल्ला झाला नाही. महाकुंभ मेळादेखील निर्विघ्नपणे पार पडला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वाराणसी येथील विराट रोड शोनंतर उपस्थित जनतेला संबोधित करताना ते बोलत होते.
काशीमध्ये आल्यावर मन प्रसन्न आणि शांत होते. देशहिताशिवाय अन्य कोणतीही गोष्ट मनात येत नाही. पुलवामा, उरी यांसारखी संकटे आली, तरी देशहिताला आणि देशाच्या सुरक्षेला प्राधान्य आणि महत्त्व नेहमीच देण्यात येईल. काशीतील संकटमोचन मंदिर, गुजरातमधील सोमनाथ मंदिर आणि अयोध्येत दहशतवादी हल्ले झाले. मात्र, तत्कालीन सरकारनी केवळ विचार करण्यात धन्यता मानली. नवा भारत तसा नाही. तो दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.
दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर दिल्यामुळेच जम्मू काश्मीरमधील ठराविक ठिकाणी दहशतवाद शिल्लक राहिला आहे. पुलवामा हल्ल्यात आपले ४० जवान शहीद झाले. यानंतर त्याच भागात ४२ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ही आमची काम करण्याची पद्धत आहे. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, याकडेही लक्ष दिले पाहिजे. शांतताप्रिय आणि प्रेमाचे संदेश देणाऱ्या श्रीलंकेसारख्या देशात दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडवले. दहशतवादाची मूळे जागतिक पातळीवर पसरली आहेत. याला कमी लेखून चालणार नाही. आपल्याकडे गाडी आणि बंगला असला, तरी सायंकाळी घरी जिवंत परतलो नाही, तर त्याचा फायदा नाही. आपल्याकडील गोष्टींचा आपण उपभोग घेऊ शकणार नाही. संपन्न आणि समर्थ भारताच्या विकासाबरोबर सुरक्षादेखील तितकीच महत्त्वाची आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
गेल्या ७० वर्षांत काय काम केले, याचा हिशोब अद्यापपर्यंत देण्यात आलेला नाही. मात्र, गेल्या ५ वर्षांत काय काम केले, याचा हिशेब देणे माझे कर्तव्य आहे. हा सर्व हिशोब जनतेला अर्पण करतो आणि आपल्याकडून पुन्हा एकदा आशीर्वाद मिळेल, अशी अपेक्षा करतो, असे सांगत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. काशीमध्ये पहिल्यांदा आलो, तेव्हा अनेक गोष्टींची कमतरता येथे होती. गंगा नदीला आपण मातेचा दर्जा देतो आणि म्हणूनच तेव्हापासून गंगा नदीची स्वच्छता करण्याचा संकल्प केला आणि आज संपूर्ण देश या भागातील बदल अनुभवत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे रोड शो करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. हा रोड शो ७ कि.मी.पर्यंत चालला. त्यानंतर त्यांनी गंगा पूजन आणि गंगा आरती यामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी उद्या, २६ एप्रिल रोजी वाराणसी येथून लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
गेल्या पाच वर्षांत देशातील एकाही मंदिरावर कोणताही हल्ला झाला नाही. महाकुंभ मेळादेखील निर्विघ्नपणे पार पडला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वाराणसी येथील विराट रोड शोनंतर उपस्थित जनतेला संबोधित करताना ते बोलत होते.
काशीमध्ये आल्यावर मन प्रसन्न आणि शांत होते. देशहिताशिवाय अन्य कोणतीही गोष्ट मनात येत नाही. पुलवामा, उरी यांसारखी संकटे आली, तरी देशहिताला आणि देशाच्या सुरक्षेला प्राधान्य आणि महत्त्व नेहमीच देण्यात येईल. काशीतील संकटमोचन मंदिर, गुजरातमधील सोमनाथ मंदिर आणि अयोध्येत दहशतवादी हल्ले झाले. मात्र, तत्कालीन सरकारनी केवळ विचार करण्यात धन्यता मानली. नवा भारत तसा नाही. तो दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.
दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर दिल्यामुळेच जम्मू काश्मीरमधील ठराविक ठिकाणी दहशतवाद शिल्लक राहिला आहे. पुलवामा हल्ल्यात आपले ४० जवान शहीद झाले. यानंतर त्याच भागात ४२ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ही आमची काम करण्याची पद्धत आहे. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, याकडेही लक्ष दिले पाहिजे. शांतताप्रिय आणि प्रेमाचे संदेश देणाऱ्या श्रीलंकेसारख्या देशात दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडवले. दहशतवादाची मूळे जागतिक पातळीवर पसरली आहेत. याला कमी लेखून चालणार नाही. आपल्याकडे गाडी आणि बंगला असला, तरी सायंकाळी घरी जिवंत परतलो नाही, तर त्याचा फायदा नाही. आपल्याकडील गोष्टींचा आपण उपभोग घेऊ शकणार नाही. संपन्न आणि समर्थ भारताच्या विकासाबरोबर सुरक्षादेखील तितकीच महत्त्वाची आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
गेल्या ७० वर्षांत काय काम केले, याचा हिशोब अद्यापपर्यंत देण्यात आलेला नाही. मात्र, गेल्या ५ वर्षांत काय काम केले, याचा हिशेब देणे माझे कर्तव्य आहे. हा सर्व हिशोब जनतेला अर्पण करतो आणि आपल्याकडून पुन्हा एकदा आशीर्वाद मिळेल, अशी अपेक्षा करतो, असे सांगत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. काशीमध्ये पहिल्यांदा आलो, तेव्हा अनेक गोष्टींची कमतरता येथे होती. गंगा नदीला आपण मातेचा दर्जा देतो आणि म्हणूनच तेव्हापासून गंगा नदीची स्वच्छता करण्याचा संकल्प केला आणि आज संपूर्ण देश या भागातील बदल अनुभवत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे रोड शो करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. हा रोड शो ७ कि.मी.पर्यंत चालला. त्यानंतर त्यांनी गंगा पूजन आणि गंगा आरती यामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी उद्या, २६ एप्रिल रोजी वाराणसी येथून लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.