कोलकाता: नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर गेल्या महिनाभरात भारत सोडणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलानं दिली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर देशात अवैध वास्तव्य करणाऱ्यांमध्ये मोठी भीती आहे. त्यामुळंच देश सोडून जाणाऱ्या घुसखोरांची संख्या वाढली आहे, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
'गेल्या महिनाभरात देश सोडून जाणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आम्ही जानेवारीत २६८ अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पकडलं होतं. त्यातील बहुतांश जण हे देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत होते,' अशी माहिती बीएसएफचे महानिरीक्षक (दक्षिण बंगाल फ्रंटियर) वाय. बी. खुरानिया यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.
CAAला पाठिंबा दिला; दलित वस्तीचे पाणी बंद
सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी उचललं पाऊल
बांगलादेश सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलानं आवश्यक पावलं उचलली आहेत. कापलेल्या तारांच्या जागी तारा लावण्यास सुरुवात केली आहे. या तारा कापणं अवघड असेल. जुन्या तारा सहज कापल्या जात होत्या. त्यातून घुसखोर भारतात प्रवेश करत होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
CAA ला राज्यांचा विरोध राजकीय पाऊल : शशी थरुर
‘आझादीवाल्यांना देशाबाहेर जाऊ द्यावे'
दरम्यान, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील पीडित अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देणाऱ्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात आंदोलनं करण्यात येत आहेत. पंजाब, केरळ या राज्यांनी त्यांच्या विधानसभेत या कायद्याविरोधात ठराव मांडला आहे. तर पश्चिम बंगाल आणि राजस्थान सरकारसुद्धा या कायद्याविरोधात विधानसभेत ठराव मांडणार आहेत.
'गेल्या महिनाभरात देश सोडून जाणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आम्ही जानेवारीत २६८ अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पकडलं होतं. त्यातील बहुतांश जण हे देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत होते,' अशी माहिती बीएसएफचे महानिरीक्षक (दक्षिण बंगाल फ्रंटियर) वाय. बी. खुरानिया यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.
CAAला पाठिंबा दिला; दलित वस्तीचे पाणी बंद
सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी उचललं पाऊल
बांगलादेश सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलानं आवश्यक पावलं उचलली आहेत. कापलेल्या तारांच्या जागी तारा लावण्यास सुरुवात केली आहे. या तारा कापणं अवघड असेल. जुन्या तारा सहज कापल्या जात होत्या. त्यातून घुसखोर भारतात प्रवेश करत होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
CAA ला राज्यांचा विरोध राजकीय पाऊल : शशी थरुर
‘आझादीवाल्यांना देशाबाहेर जाऊ द्यावे'
दरम्यान, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील पीडित अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देणाऱ्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात आंदोलनं करण्यात येत आहेत. पंजाब, केरळ या राज्यांनी त्यांच्या विधानसभेत या कायद्याविरोधात ठराव मांडला आहे. तर पश्चिम बंगाल आणि राजस्थान सरकारसुद्धा या कायद्याविरोधात विधानसभेत ठराव मांडणार आहेत.