अ‍ॅपशहर

टिकटॉक 'व्हिलन'ने तिघांची हत्या करून केली आत्महत्या

टिक-टॉक या सोशल मीडिया साइटवर 'व्हिलन' म्हणून ओळख असलेला आणि अल्पावधीतच त्याच्या व्हीडिओंमुळे सुमारे २८ हजार फॉलोअर्स असलेल्या उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील अश्विनी कश्यप याने एका मुलीसह तिघांची हत्या करीत स्वत: आत्महत्या केली

महाराष्ट्र टाइम्स 18 Oct 2019, 5:20 am
बिजनौर : टिक-टॉक या सोशल मीडिया साइटवर 'व्हिलन' म्हणून ओळख असलेला आणि अल्पावधीतच त्याच्या व्हीडिओंमुळे सुमारे २८ हजार फॉलोअर्स असलेल्या उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील अश्विनी कश्यप याने एका मुलीसह तिघांची हत्या करीत स्वत: आत्महत्या केली आहे. अश्विनी हा चित्रपटातील 'व्हिलन्स'पासून खुप प्रभावित होता. त्याच प्रकारचे व्हीडिओ तो शेअर करायचा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम तिघांची हत्या करून आत्महत्या


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने निकिता नावाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. गावातीलच दोन दोन मुलांनी त्याचा अपमानही केला होता. त्यामुळे तो सुडाच्या भावनेने पेटला होता. 'कबीर सिंग' हा चित्रपट पाहिल्यानंतर अश्विनीने एक व्हीडिओ टिक-टॉकवर पोस्ट केला. त्यात त्याने त्याच चित्रपटातील एक संवाद म्हटला. 'जो मेरा नही हो सकता, उसे किसी और का हो जाने का मौका नहीं दूंगा' असे त्याचे उद‌्गार होते. त्यानंतर त्याने निकिताची हत्या केली. त्यानंतर त्या दोन युवकांचीही त्याने गोळ्या घालून हत्या केली, ज्यांनी त्याची खिल्ली उडवून अपमान केला होता. मात्र भानावर आल्यानंतर त्याला पोलिस पकडतील असे वाटू लागले. त्यामुळे फेसबुकवर 'दोस्तो मेरा आखरी मॅसेज, मै दुनिया छोड के जा रहा हू' असा संदेश टाकत त्याने आत्महत्या केली. या तीन हत्यांनंतर अश्विनीला पकडून देणाऱ्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी ५० हजार रूपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज